---Advertisement---

आधी विराट, मग अनुष्का! विश्वचषकापूर्वी जोडप्याने तिकीटे मागण्यावरून मित्रांना केली खास अपील, स्टोरी व्हायरल

Virat-Kohli-And-Anushka-Sharma
---Advertisement---

गुरुवारपासून (दि. 5 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा श्रीगणेशा होत आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होईल. अशात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या मित्रांना आणि चाहत्यांना खास अपील केली आहे. विराट कोहली इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून असे काही बोलला आहे, जे सर्वत्र चर्चेत आहे.

खरं तर, विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमार्फत (Instagram Story) आपल्या मित्रांना आणि चाहत्यांना खास अपील केली आहे की, विश्वचषकादरम्यान त्याच्याकडे सामन्यांची तिकीटे मागण्याचा प्रयत्न करू नये.

काय म्हणाला विराट?
विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “जसजसा आपला विश्वचषक जवळ येत आहे, मी माझ्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो की, त्यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान मला तिकीट मागण्याची विनंती करू नये. तसेच, आपल्या घरातूनच सामन्यांचा आनंद लुटा.”

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1709424065998663961

अनुष्काची प्रतिक्रिया
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने यावेळी विराटची स्टोरी रिपोस्ट करत लिहिले की, “मला फक्त एक गोष्ट जोडू द्या… जर तुमचे संदेश अनुत्तरीत असतील, तर कृपया मला मदत करण्याची विनंती करू नका. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.” आता विराट आणि अनुष्काची ही स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1709430084510347618

याव्यतिरिक्त भारतीय संघाच्या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या अभियानाला सुरुवात करेल. या विश्वचषकात विराट कोहली भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे. विराटची विश्वचषकातील आकडेवारी खूपच जबरदस्त आहे. विराट विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.

विराटने आतापर्यंत खेळलेल्या 3 वनडे विश्वचषकातील एकूण 26 सामन्यात 46.81च्या सरासरीने 1030 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे. विशेष म्हणजे, भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. त्याने 45 सामन्यांमध्ये 6 शतकांच्या मदतीने आणि 56.95च्या सरासरीने 2278 धावा केल्या आहेत. (star cricketer virat kohli instagram story viral special appeal to fans start of the world cup 2023 )

हेही वाचा-
‘जगात सर्वात जास्त दबाव टीम इंडियावर…’, विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे लक्षवेधी विधान
गाथा भारताच्या पहिल्या विश्वविजयाची! कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेलं जग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---