ऑस्ट्रेलिया संघाने मागील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. या सामन्याला आता महिनाभरापेक्षा जास्त अवधी झाल्यानंतरही भारतीय संघावरील टिकांचे सत्र सुरूच आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पुन्हा एकदा भारतीय संघ व कर्णधार रोहित शर्मावर टीकास्त्र डागले.
या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने तयारीसाठी कमी वेळ मिळाला असे कारण दिले होते. त्याच वक्तव्याचा समाचार घेताना म्हटले,
“तुम्ही त्या महत्त्वाच्या सामन्याआधी सराव सामना खेळत नाही. मात्र, वेस्ट इंडिजविरूद्ध तुम्ही दोन सराव सामने खेळता. मी तर म्हणतो की तुम्ही प्रत्येक कसोटी मालिकेआधी दोन सराव सामने खेळावेत.”
भारतीय संघ आयपीएलनंतर थेट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला. आयपीएल अंतिम सामना व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केवळ सात दिवसांचा कालावधी होता.
गावसकर यांनी भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले,
“तुम्ही दाखवता की खेळाडू तंदुरुस्त आहेत. मात्र, सत्य परिस्थिती तशी नाही. हे खेळाडू लवकर दमतात. तुम्ही केवळ 20 षटकांचे सामने खेळता तरी तुमचा वर्कलोड कसा काय मॅनेज करावा लागतो.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासमोर विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावांचे लक्ष्य ठेवले गेले होते. पण संघ शेवटच्या डावात 234 धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव 296 धावांवर गुंडाळला गेला होता. भारतीय संघाने या स्पर्धेच्या पहिल्या सायकलमध्ये देखील अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारलेला.
(Sunil Gavaskar Slam Team India Again On WTC Loss)
महत्त्वाच्या बातम्या-
आरंभ है प्रचंड! बेंगलोरमध्ये तयार होतेय वर्ल्डकपसाठीची टीम इंडिया
रोहितने दिलेल्या सल्ल्यामूळे बदलले तिलक वर्माचे करियर! लहानपणीच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा