---Advertisement---

सूर्यकुमार यादव की शुबमन गिल! टीम इंडियाचा कर्णधार कोण? समोर आली मोठी अपडेट

On: गुरूवार, ऑगस्ट 14, 2025 3:45 PM
---Advertisement---

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. मात्र अजूनही बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. अहवालानुसार 19 किंवा 20 ऑगस्टला बीसीसीआय आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. आता मोठा प्रश्न असा आहे की या स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल. शुबमन गिल की सूर्यकुमार यादव? सध्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा रेकॉर्ड आतापर्यंत खूपच चांगला राहिला आहे. पण सध्या सूर्या पूर्णपणे फिट नाहीत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी शुबमन गिलला टेस्ट टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते आणि या मालिकेत गिलने केवळ कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणूनही जबरदस्त खेळ करून दाखवला होता. या मालिकेत गिलने सर्वाधिक 754 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत ठेवली होती. त्यामुळे आता आशिया कप 2025 मध्येही शुबमन गिलची कर्णधारपदाची जबाबदारी पाहायला मिळू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---