भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (28 नोव्हेंबर) खेळला गेला. गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला विजय साजरा केला. भारतीय संघाच्या या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने महत्वाची प्रतिक्रिया ठरली.
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ या सामन्यातील विजयाचा दावेदार होता. मात्र ग्लेन मॅक्सवेल याचे नाबाज शतक व मॅथ्यू वेड याने मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 223 धावांची आव्हान पार केले. भारतीय संघाच्या पराभवानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला,
“मॅक्सवेलला लवकरात लवकर बाद करण्याची योजना होती. 220 धावांचा बचाव करताना एवढे दव असताना गोलंदाजांना काहीतरी वेगळे आवश्यक असते. ऑस्ट्रेलिया नेहमीच खेळात होता. गोलंदाजांना सांगितले की आपण मॅक्सवेलला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू पण तसे झाले नाही. तो अफलातून खेळत होता. अक्षर हा अनुभवी गोलंदाज आहे. दव असतानाही त्याने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे.”
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या होत्या. भारतासाठी उपकर्णधार ऋतुराज गायकवाड याने 57 चेंडूंमध्ये नाबाद 123 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कर्णधार सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी देखील उपयुक्त योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला हेडने वादळी सुरुवात दिली. त्यानंतर मॅक्सवेलने अखेरपर्यंत नाबाद राहतात 48 चेंडूंमध्ये 104 धावांची खेळी केली. त्यामुळे आता मालिकेतील उर्वरित दोन सामने आणखी महत्त्वाचे ठरणार आहेत.
(Suryakumar Yadav Statment After Lost Against Australia In 3rd T20I)
महत्वाच्या बातम्या
आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मोहम्मद हाफीजचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी स्वत: त्याला…
‘माझं नाव व्हीव्हीएस लक्ष्मण आहे’, पहा असं का म्हणाला इशान किशन