टी२० विश्वचषकातील १४ व्या सामन्यात शनिवारी (२३ ऑक्टोबर) इंग्लंडने वेस्ट इंडीजचा दारुण पराभव केला होता. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम गोलंदाजी करत वेस्ट इंडीजला १४.२ षटकात आणि अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने केवळ ८.२ षटकात आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावे लागले. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनी वेस्ट इंडीज संघावर जोरदार टीका केली आहे.
वेस्ट इंडीजला विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना तर करावा लागला होता. त्यापूर्वी वेस्ट इंडीजला सराव सामन्यातही पराभव पत्करावा लागला होता. विश्वचषकात वेस्ट इंडीज संघाला मिळालेला हा सलग तिसरा पराभव होता. २६ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते पराभूत झाले. यावेळी त्यांनी वेस्ट इंडीज संघावर प्रश्न उपस्थित केला आहे. आकाश चोप्रांच्या मते वेस्ट इंडीज संघ विश्वचषकात फक्त फिरण्यासाठी आला आहे.
यावेळी बोलताना आकाश चोप्रा म्हणाले की, “हा त्या दोन संघामधील सामना आहे, जे त्यांचा पहिला सामना पराभुत झाले आहेत. दक्षिण अफ्रिकेने चांगल्या संघर्षानंतर सामना गमावला. पण वेस्ट इंडीज गतविजेता संघ आहे, असे वाटत नाही. ते येथे गंभीरतेने खेळ्यासाठी आले आहेत. असे वाटत आहे की, ते टूरिस्ट वीजावर दुबई फिरायला आले आहेत. आम्हाला माहीत नाही की, वेस्ट इंडीज आता काय करू शकतो. जर त्यांनी धावा करायच्या ठरवल्या तर, ते २२५ धावाही करू शकतात, पण त्यांनी तसे केले नाही तर १२५ धावाही करू शकणार नाहीत. मागच्या सामन्यात असेच काही झाले होते.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते केवळ १४३ धावा करु शकले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ दोन गडी गमावून हे लक्ष पार केले.