कसोटी मालिकेतील १-२ अशा पराभवानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ वनडे मालिकेत एकूण ६ सामने होणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर कर्णधार विराट कोहली पुन्हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दीड महिन्यांनी खेळणार आहे.
या वनडे मालिकेत शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या मुंबईकर खेळाडूंना तर केदार जाधव या महाराष्ट्राच्या एकमेव खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
मागच्या काही वनडे मालिकेप्रमाणे याही वनडे मालिकेत आर अश्विन आणि रवींद्र जडेजाची निवड करण्यात आलेली नाही. तसेच डिसेंबर महिन्यात यो यो फिटनेस टेस्ट यशस्वी पार केलेल्या युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनाही संधी दिलेली नाही.
भारतीय संघात जडेजा आणि अश्विन ऐवजी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केलेल्या श्रेयश अय्यरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. चहल आणि कुलदीप बरोबर अक्षर पटेलचीही निवड झाली आहे.
१ फेब्रुवारी रोजी पहिला वनडे सामना होणार असून १६ फेब्रुवारी रोजी सहावा आणि शेवटचा वनडे सामना सेंच्युरियनवर होणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.
भारतीय संघाची टी२० मालिका ही डबल हेडर असून भारतीय पुरुष संघाच्या तीन टी२० सामन्यांबरोबर महिलांच्या टी२० मालिकेतील ५ पैकी शेवटचे तीन सामने होतील. महिला संघ या दौऱ्यात तीन वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. हा दौरा २ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी असा असेल.
भारतीय पुरुष संघाचा दुसरा वनडे सामना आणि पहिला टी२० सामना हा फक्त दिवस रात्र होणार नसून बाकी संपूर्ण वनडे आणि टी२० मालिका दिवस-रात्र सामन्यांची असेल.
असा आहे वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली(कर्णधार),रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयश अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम एस धोनी(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.