टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला आणि सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला एक प्रकारे इशाराच दिला आहे. भारताच्या 3 खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.
टीम इंडियाला आपल्या प्लेइंग-11 मध्ये 3 बदल करावे लागतील. अभिषेक शर्माला बाहेर करून संजू सॅमसनला संधी द्यावी लागेल, तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेलला संधी द्यायला हवी. याशिवाय, रिंकू सिंगच्या जागी कुलदीप यादवला संधी द्यायला हवी. कुलदीप हा ‘विकेटटेकर’ गोलंदाज आहे आणि तो टीम इंडियासाठी शानदार कामगिरी करू शकतो.





