न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 7 विकेट्सने जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे मालिका न्यूझीलंडच्या नावावर झाली. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात बाकावर बसून राहिला. त्याला संघातून बाहेर बसवल्यामुळे चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच कर्णधार शिखर धवन याची प्रतिक्रिया समोर येत आहे.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर नव्हता. अशात एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या खांद्यांवर होती. मालिका गमावल्यानंतर धवनने माध्यमांशी चर्चा करताना नाराजी व्यक्त केली. सोबतच संजू सॅमसनविषयी मोठी प्रतिक्रिया देखील दिली. संजू सॅमसन (Sanju Samson) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील कोणत्या फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचे हा कर्णधारासाठी मोठा निर्णय असतो. सॅमसनने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 36 धावांची खेळी केली होती, पण तरी देखील पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. कर्णधार धवनने आता त्याला संघातून वगण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
सॅमसला संघातून बाहेर ठेवून संघ व्यवस्थापनाने पंतला संधी दिली, पण त्याने ही संधू पूर्णपणे वाया घातल्याचेच या मालिकेत दिसले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंत अवघ्या 16 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. उभय संघांतील हा सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला गेला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 219 धावा केल्या होत्या. पण प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर धवन माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “तुम्ही मोठा विचार करावा लागेल आणि मॅच विनर कोण आहे? हे ठरवावे लागेल. तुम्ही या गोष्टीचे विश्लेषण करता आणि तुमचे निर्णय याच गोष्टींवर आधारित असतात.”
“नक्कीच संजू सॅमसनला ज्या संधी मिळाल्या आहेत, त्यात त्याने चांगले प्रदर्शन केले. पण कधी-कधी तुम्हा तुमच्या संधीची वाट पाहावी लागते. कारण दुसऱ्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. आपण त्याच्या (पंत) गुणवत्तेच्या आधारे जाणतो की, तो मॅच विनर आहे. याच कारणास्तव तो चांगले प्रदर्शन करत नसला, तेव्हा त्याचे पाठबळ देण्याची गरज आहे,” असे धवन पुढे बोलताना म्हणाला. पंतने न्यूझीलंड दौऱ्यात केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर 6, 11, 15 आणि 10 असे राहिले आहे. (That’s why Rishabh Pant gets a chance before Sanju Samson)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार धवनसह ‘हे’ सात खेळाडू भारतात परतलेच नाही, ‘असा’ आहे संघाचा पुढचा प्लॅन
रिषभ पंतला का दिली जात आहे जास्त संधी? वीवीएस लक्ष्मणने केला खुलासा