आज बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. तर यामध्ये नव्या चेहऱ्यालाही संघात संधी मिळाली आहे. तर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत. याशिवाय विराट कोहलीने आपले नाव मागे घेतले आहे. तसेच श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारताचे उर्वरित सामने गमावणार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अय्यर भारताच्या सुरुवातीला संघाचा भाग होता. पण, मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी त्याला संघातून वगळण्यात आले आहे. तर, अहवालानुसार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. तसेच, त्याला दुसऱ्या कसोटीत फॉरवर्ड डिफेन्स करताना वेदना जाणवत होता. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे.
तसेच, या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये रंगणार आहे. दरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
याबरोबरच, श्रेयस अय्यरला गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याला मैदानापासून बराच काळ दूर राहावं लागलं होतं. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ लागला आहे. तो जर या मालिकेतून बाहेर पडला. तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जाईल. त्यामुळे सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल.
पुढीलप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघ :-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.