---Advertisement---

चेन्नईचा किल्ला कोसळल्यानंतर स्टीफन फ्लेमिंग यांनी मान्य केली चूक, CSK चाहत्यांना दिलं आणखी एक वचन

---Advertisement---

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शुक्रवार 26 एप्रिल रोजी झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाची अवस्था फारच खराब झाली आहे. आता संघ प्लेऑफच्या रेस मधून बाहेरच पडला आहे. चेन्नई संघासाठी हा हंगाम खूपच खराब राहिला. त्यांनी 9 सामनांमधील 7 सामने गमावले आहेत. त्यांच्या घरेलू मैदानावर मजबूत मानली जाणारी चेन्नई टीम चेपॉक स्टेडियमवर 4 वेळा पराभूत झाली. याआधी हे 2008 आणि 2012 मध्ये झाले होते. चेपॉकमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 2008 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाने पहिल्यांदा येथे विजय मिळवला आहे, त्यामुळे चेन्नईचा किल्ला पूर्णपणे ढासळलेला दिसून येत आहे.

सातत्याने लाजिरवाण्या पराभवानंतर चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मेगा लिलावात झालेल्या चुका मान्य केल्या आहेत. त्यांनी मागच्या सामन्यातील पराभवानंतर म्हटले होते की, ते सलग 6 सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निर्माण करू शकतात. आता पराभवानंतर त्यांनी चाहत्यांना अजून एक वचन दिले आहे. ते म्हणाले, आता उरलेल्या सामन्यांमध्ये आम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल. कारण पुढच्या हंगामासाठी चांगली तयारी आम्ही करू शकू.

फ्लेमिंग पुढे बोलताना म्हणाले, मला वाटते की क्रिकेटमध्ये जास्त बदल झालेला नाही. समजूतदारपणाने खेळणे आणि चांगले विचार करणे गरजेचे आहे. संघ षटकार- चौकारांवर जास्त लक्ष देत आहे आणि त्यामुळे अवघड असे शॉर्ट खेळत आहे. पण स्पर्धेच्या शेवटी हे स्पष्ट होईल की, कोणता संघ टिकू शकला. जे संघ संतुलित आहे आणि ज्यांमध्ये युवा जोश आहे ते चांगले सामने खेळत आहेत. मला बघायचे आहे की, कोणते फलंदाज जास्त धावा करतात आणि कोणता संघ चांगला खेळतो. त्यामुळे आम्हाला पुढच्या योजना बनवण्यासाठी मदत होईल.

फ्लेमिंग पुढे म्हणाले, आम्ही सातत्याने नव्या खेळाडूंना संधी देत आहोत. आज ब्रेविसने चांगली फलंदाजी केली, म्हात्रे सुद्धा चांगला खेळाडू आहे. आम्ही खूप खेळाडूंना संधी दिल्या, जे की आयपीएलमध्ये खूप कमी प्रमाणात होते. हे सर्व आमच्यासाठी आव्हानात्मक आहे, पण आम्ही प्रत्येक सामन्यात चांगली मेहनत करू आणि पुढच्या हंगामासाठी समाधान मिळेल अशी कामगिरी करू.

नीलामी म्हणजे सोपी प्रक्रिया नाही हे मानसिक आणि शारीरिक रूपाने सुद्धा खूप वेगळे आहे. तरीही मला वाटते की, आमच्याकडे एक चांगला संघ आहे. आम्ही जास्त मागे नाही आहोत. काही महत्त्वाचे खेळाडू दुखापती झाल्यामुळे आणि काही खेळाडू खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे आम्ही चांगली रणनीती नाही बनवू शकलो. संघामध्ये आम्ही जास्त बदल केले. कदाचित आम्ही असे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, जे आमच्याकडे नव्हते. ही जबाबदारी माझी आहे आणि ही माझ्यापासूनच सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---