एकीकडे भारतीय संघातील काही खेळाडूंची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे, तर दुसरीकडे असे काही क्रिकेटपटू आले असे आले ज्यांची कामगिरी फारशी विशेष नाही. भारतीय संघात चांगली कामगिरी न करताही काही खेळाडूंना संघात स्थान मिळालं, तर उत्तम कामगिरी करूनही अनेक खेळाडू संघाबाहेर राहिले.
खरं तर, यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा दोष नाही किंवा संघ व्यवस्थापनाचा दोष नाही. यासाठी परिस्थिती तशी असावे लागते, कारण बर्याच वेळा असे घडते की जेव्हा काही चांगले युवा खेळाडू संघात आपले स्थान निर्माण करतात. ज्यामुळे कर्णधारने त्या खेळाडूंना अधिक संधी दिली, आणि अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या कौशल्याकडे दुर्लक्ष केले गेले.
काही काळासाठी यापैकी काही क्रिकेटपटू भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग होते. परंतु संघातील युवा प्रतिभावान खेळाडूंमुळे त्यांना संघात सामील होण्यासाठी सतत संघर्ष करावा लागला. जेव्हा कोणता खेळाडू अधिक चांगली कामगिरी करत नसेल तेव्हा या खेळाडूंना संधी मिळायची. परंतु जर या खेळाडूंनी वेळीच संधी मिळाली असती तर त्यांना आज क्रिकेट इतिहासातील दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये स्थान मिळाले असते.
जाणून घेऊया अशाच काही भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जे योग्य वेळी संघात आले असते तर दिग्गज खेळाडू ठरले असते.
३. एस. बद्रीनाथ (Subramaniam Badrinath)
‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा एस. बद्रीनाथ रणजी चषकातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०,२४५ धावा केल्या आहेत. त्यात त्याची सरासरी ५५ पेक्षा थोडी कमी होती. त्याने केवळ कसोटीच नव्हे तर छोट्या स्वरूपातही चांगली कामगिरी बजावली आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात तो चांगला खेळतो.
आयपीएलमध्येही त्याने त्याचा खेळ दाखविला. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने अनेक वेळा प्रेक्षकांची मने जिंकली. दुर्दैवाने, त्याला भारतीय संघासाठी फक्त २ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली, त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. वर्ष २०१८ मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली.
भारताकडून दोन कसोटी सामने खेळणार्या बद्रीने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत १४५ सामन्यांत ३२ शतके आणि ४५ अर्धशतकांच्या मदतीने १०,२४५ धावा केल्या. जर बद्रीनाथने योग्य संधी मिळाली असती तर तो देशातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये नक्कीच सामील झाला असता.
२. राजिंदर गोयल (Rajinder Goel)
योग्य वेळी संघात पदार्पण करता न आलेल्या दुर्दैवी खेळाडूंच्या यादीत राजिंदर गोयल यांचे नाव प्रथम येतो. जर त्याना योग्य वेळी संघात स्थान मिळाले असते तर ते आज दिग्गज खेळाडूंच्या यादीत असते. राजिंदर गोय यांनी ६० आणि ७० च्या दशकात देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करूनही ते राष्ट्रीय संघासाठी कसोटी सामना खेळू शकले नाही.
ते एक आपल्या काळातील सर्वात प्रतिभावान फिरकीपटूंपैकी एक होते, पण आधीपासूनच दिग्गज फिरकीपटू संघात असल्यामुळे त्यांना भारतीय संघात कधीही स्थान मिळालं नाही.
असे असूनही, गोयल देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिले आणि निवृत्तीच्यावेळी ते रणजी इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू होते. त्यांनी आपल्या संपूर्ण रणजी कारकिर्दीत ६३७ बळी घेतले. आजही हा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
राजिंदर गोयल यांचा हा विक्रम मोडणे अशक्य वाटते कारण कोणत्याही खेळाडूला सातत्याने चांगली कामगिरी करणे अवघड आहे. हा विक्रम मोडण्यात आणखी एक अडथळा आहे, जेव्हा एखादा खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याला भारतीय संघात स्थान मिळते आणि त्यानंतर तो खेळाडू रणजी चषकाकडे क्वचितच लक्ष देतो. त्यामुळे नजीकच्या काळात राजिंदर गोयल यांचा हा विक्रम मोडणे अशक्य आहे.
१. अमोल मजूमदार (Amol Muzumdar)
प्रथम श्रेणीमध्ये दमदार कामगिरी करूनही अमोल मजूमदारला भारतीय संघाकडून एकाही कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अमोल मजूमदार हा भारताचा दुर्दैवी क्रिकेटपटू असल्याचे म्हटले जाते. मजुमदार हा रणजी चषकाच्या इतिहासात दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रणजीत त्याने २८ शतकेही केली आहेत.
कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईचा हा फलंदाज भारतीय क्रिकेटच भविष्य मानला जात होता. पण १९९३/९४ मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण करणाऱ्या मजूमदारला कधी भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या प्रथम श्रेणी पदार्पण सामन्यात त्याने २६० धावा केल्या होत्या. १७१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ४८ च्या सरासरीने ११,१६७ धावा केल्या आहेत.
यात ३० शतके आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. या कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी का मिळाली नाही याचे उत्तर अजूनही कुणाकडे नाही. त्यांच्याबद्दल एकदा असे म्हटले गेले होते की तो भारताचा दुसरा सचिन बनू शकला असता, परंतु भारतीय संघाकडून खेळणे हे त्याच्या नशिबात नव्हते.
वाचनीय लेख –
एकट्याच्या जीवावर इंग्लंड नडणारा परंतू आता विस्मृतीत गेलेला वेणुगोपाल राव
क्रिकेटमधील सर्वात मस्तमौला खेळाडू, ज्यांनी भारताला दिला सौरव गांगुली नावाचा हिरा
५ वर्षानंतरचा असा असेल भारतीय कसोटी संघ, पहा कोण असेल कर्णधार…