भारतीय संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. त्यापूर्वी नॉटिंघम येथे पहिला कसोटी सामना पार पडला. पहिला सामना अनिर्णित राहिला. तर दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या दोन्ही सामन्यात भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.
मात्र, गेल्या काही काळापासून तो खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे संघातील त्याच्या स्थानावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. रहाणेने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत केवळ सहाच धावा केल्या आहेत. त्यामुळे रहाणेचे संघातील स्थान संपुष्टात येऊ शकते. राहणे सध्या भारतीय संघात कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे जर त्याला संघातून वगळण्यात आले, तर त्याचे उपकर्णधारपदही जाऊ शकते. त्याचबरोबर संघात असे असेही काही खेळाडू आहेत, जे रहाणेची ही जागा घेऊ शकतात. या लेखातून त्याच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
रोहित शर्मा –
भारतीय संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्मा सध्या भारतीय संघात मर्यादीत षटकांचा उपकर्णधार आहे. त्याने अनेकदा विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. रोहितला नेतृत्त्वाचा चांगलाच अनुभव देखील आहे. रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत संघाला तब्बल ५ वेळा आयपीएलचे किताब मिळवून दिले आहे. यामुळे अनेक वेळा चाहत्यांकडून रोहितलाच विराट कोहली ऐवजी भारतीय संघाचा कर्णधार बनण्याची मागणी देखील करण्यात येत होती. तसेच रोहितने गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला जर संघातून वगळले गेले तर रोहित शर्माला उपकर्णधार पद मिळू शकते.
केएल राहुल –
केएल राहुल गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून खेळत आहे. राहुल हा असा खेळाडू आहे जो भारतीय संघात कोणत्याही क्रमांकावर येऊन फलंदाजी करू शकतो. कित्येक वेळा त्याने असे केले देखील आहे. राहुलने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. राहुलने गेल्यावर्षीपासून आयपीएलच्या पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. तसेच राहुल सध्या भारतीय संघाचा एक प्रमुख फलंदाज बनला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यातही त्याने दोन्ही कसोटी सामन्यात कमालीची फलंदाजी केली. ज्यात त्याने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ८४ धावा केल्या. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात १२९ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघातील उपकर्णधारपद राहुलकडे जाण्याची शक्यता आहे.
रिषभ पंत –
भारतीय संघाचा युवा खेळाडू रिषभ पंतने गेल्या काही काळापासून आपल्या खेळाच्या जोरावर संघातील स्थान पक्के केले आहे. रिषभ पंत सध्या भारतीय संघातील एक प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज आहे. तसेच अनेक दिग्गजांनी येणाऱ्या काळात रिषभ पंत भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच रिषभ पंत मायदेशात आणि विदेशातही चांगली खेळी करतो. केवळ फलंदाजीत नव्हे तर यष्टीरक्षणातही रिषभ पंत चांगली कामगिरी करत आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या १४ व्या हंगामात रिषभ पंतने श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटलचे नेतृत्व केले होते. त्यामुळे रिषभ पंत कर्णधारपदही भूषवू शकतो प्रचीती होते. त्यामुळे तोही भारतीय संघाचा उपकर्णधार होण्याचा दावेदार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–मैदानाबाहेरील कला! जेमिमाह रॉड्रिग्सने गिटारवर ‘दिल चाहता हैं’ चे प्रसिद्ध गाणे केले सादर; पाहा व्हिडिओ
–भारताविरुद्ध सामना म्हटलं की रुटची जबरदस्त कामगिरी ठरलेलीच! आकडे पाहून बसेल विश्वास
–वाह रे पठ्ठ्या! जोस बटलरची विकेट घेताच ईशांत शर्माचा कुंबळे, कपिल देव यांच्या पंक्तीत समावेश