भारत-बांगलादेश (India And Bangladesh) नुकतीच 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने 2-0 ने भारताने वर्चस्व गाजवले. पण आता भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघातील पहिला टी20 सामना (6 ऑक्टोबर) पासून सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर देखील झाला आहे. तत्पूर्वी आपण भारताची पहिल्या सामन्यात प्लेइंग 11 कशी असू शकते, हे जाणून घेऊया.
दोन्ही संघातील पहिला टी20 सामना ग्वालियर येथे खेळला जाणार आहे. बांगलादेशला भारताविरूद्ध विजय मिळवणे सोपे नसणार आहे. पहिल्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), संजू सॅमसनला (Sanju Samson) सलामीची संधी देऊ शकतो, तर रियान पराग, हार्दिक पांड्याची जागा जवळपास निश्चित झाली आहे. रिंकू सिंग, शिवम दुबे यांनाही भारतीय संघ संधी देऊ शकतो.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू शकतो. अर्शदीपने अनेक प्रसंगी खतरनाक गोलंदाजी केली आहे. त्याच्यासोबत मयंकलाही संधी मिळू शकते. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) शेवटच्या हंगामात मयंकने आपल्या वेगवान गोलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे भारतीय संघात त्याची जागा होऊ शकते.
पहिल्या टी20 सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग 11- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयंक यादव
महत्त्वाच्या बातम्या-
संजय मांजरेकरांची जीभ पुन्हा घसरली, महिला विश्वचषकातील कॉमेंट्रीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य
विकेटही घेतल्या, शतकही ठोकलं! टीम इंडियाला मिळाला नवा अश्विन?
हार्दिक पांड्या बनू शकतो भारताचा टॉप टी20 गोलंदाज, भुवनेश्वर कुमारचा मोठा विक्रम धोक्यात