भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थातच बीसीसीआयने नुकताच आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी यूएईची निवड केली आहे. आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे कळत आहे. या मोसमाच्या सुरुवातीला कोरोनाच्या सावटाखाली भारतात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. पहिला टप्पा सुरक्षितपणे पार पडल्यानंतर काही संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे दिसून आले. या कारणास्तव बीसीसीआयने खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता .
यूएईत उर्वरित हंगाम घेण्याच्या निर्णयावर बीसीसीआयने एक पत्रकार परिषदेत सांगितले की, हा निर्णय भारतातील पावसाळ्याच्या मोसमाकडे बघून घेण्यात आला आहे. तसे पाहिले तर, युएईमध्ये आयपीएल 2021 चे राहिलेले सामने खेळवणे हा निर्णय अनेक मार्गांनी चांगला आहे. आयपीएल 2020 युएईमध्ये यशस्वीपणे पार पडली होती. या कारणामुळेही हा निर्णय चांगला मानला जाऊ शकतो. याबरोबरच इतरही काही कारणे आहेत.
या लेखात, आम्ही त्याच 3 कारणांचा उल्लेख करणार आहोत, ज्यामुळे युएईमध्ये आयपीएल 2021 च्या राहिलेले सामने आयोजित करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.
1. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य- जेव्हा भारतात आयपीएल 2021 ची सुरुवात झाली, तेव्हा कोरोनाचा धोका खूपच जास्त होता आणि बर्याच तज्ञांनी यावेळी आयपीएल आयोजित न करण्याचा सल्लाही दिला होता. तरीही बीसीसीआयने भारतातच यंदाचा आयपीएल हंगाम आयोजला. पहिल्या टप्प्यात काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु त्यांची संख्या फार कमी होती. मात्र २९ सामन्यांनंतर काही खेळाडूंकडून बायो बबलचे उल्लंघन करण्यात आले आणि खेळाडू व सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला.
अशा परिस्थितीत युएईचा पर्याय हा सुरक्षेत्या दृष्टीकोनातून एक चांगला पर्याय आहे. मागील वर्षीही कोरोनाचा थोडाफार धोका असतानाही येथे आयपीएलचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आयपीएलच्या उरलेल्या चौदाव्या हंगामाचे युएईमध्ये आयोजन करण्याचा निर्णय योग्य आहे.
2. भारतापेक्षा खेळाडूंना यूएईमध्ये जास्त सुरक्षित वाटेल- आयपीएल 2021 दरम्यान बर्याच खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यापूर्वीही अनेक खेळाडूंनी सुरक्षा लक्षात घेऊन स्पर्धेच्या आधी किंवा मध्यात माघार घेतली होती. त्यात बहुतेक परदेशी खेळाडू होते, ज्यांनी वैयक्तिक कारणे सांगत सुरक्षित न वाटल्यामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर बऱ्याचशा खेळाडूंनी सांगितले होते की, आयपीएलचे आयोजन भारतापेक्षा युएईमध्ये अधिक चांगले झाले असते.
चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक मायकल हस्सीने काही दिवसांपुर्वी सांगितले होते की, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी परदेशी खेळाडू भारत दौरा करण्यास घाबरतील. त्यामुळे परदेशी खेळाडूंना भारतापेक्षा यूएईमध्ये आयपीएल खेलणे अधिक सोईचे आणि सुरक्षित वाटेल.
3. टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी चांगला पर्याय- बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी युएईचे बॅकअप स्थळ म्हणून सहमती दर्शविली आहे. अशात आयपीएल 2021 चे उर्वरित सामने यूएईत झाल्यास खेळाडूंना तेथील मैदानांचा चांगला सराव होईल. यानंतर विश्वचषक सामनेही यूएईच्या मैदानावर झाल्यास सर्वच संघांसाठी सोईचे जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मास्टर ब्लास्टरचा ‘हा’ विश्वविक्रम धोक्यात, जेम्स एंडरसन येत्या मालिकेत करणार आपल्या नावे
चाहत्यांसाठी खुशखबर, ‘ही’ अट पूर्ण केल्यास आयपीएल सामन्यांना मैदानात मिळणार प्रवेश
नको रे बाबा! ‘या’ गोलंदाजापुढे रनमशीन कोहलीलाही फुटायचा घाम, सर्वच फलंदाज होते त्रस्त