काही दिवसांपूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी विशेषतः आयपीएल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली होती. एप्रिल-मे महिन्यात भारतात खेळवला गेलेला आयपीएलचा चौदावा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यातच स्थगित करण्यात आला होता. मात्र आता उर्वरित सामने येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली होती. संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये हे सामने आता खेळवले जाणार आहेत.
आयपीएलचा थरार पुन्हा एकदा अनुभवता येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाची लहर आहे. मात्र आता हा आनंद द्विगुणित करणारे वृत्त समोर आले आहे. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी मैदानात प्रेक्षकांना देखील प्रवेश दिला जाऊ शकतो.
प्रवेशासाठी असेल ‘ही’ अट
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नसला तरी देखील युएई सरकाराच्या नियमांनुसार प्रेक्षकांना सामन्या दरम्यान मैदानात प्रवेश दिला जाऊ शकतो. अर्थात मैदानाच्या प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकच सामन्यासाठी उपस्थित राहू शकतील. मात्र यासाठी एक महत्वाची अट ठेवल्या जाईल. ती म्हणजे ज्या प्रेक्षकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले असेल त्यांनाच मैदानात प्रवेश दिल्या जाईल.
बीसीसीआय अधिकारी पोहोचले दुबईत
आयपीएल २०२१चा हंगाम भारतात आयोजित करण्यात आला होता. मात्र जवळपास अर्धा हंगाम झाला असतांना काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा हंगाम बीसीसीआयने तात्पुरता स्थगित केला होता. त्यानंतर २९ मेला बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईत खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आता बीसीसीआयने उर्वरित हंगामाची जोरदार तयारी सुरू केली असून बीसीसीआयचे अधिकारी दुबईत पोहोचल्याचे वृत्तही समोर आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला दुबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी आता युएई सरकार आणि क्रिकेट बोर्डाशी हंगामाच्या आयोजनाबाबत चर्चा करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
नको रे बाबा! या गोलंदाजापुढे रनमशीन कोहलीलाही फुटायचा घाम, सर्वच फलंदाज होते त्रस्त
खराब फॉर्ममध्ये असलेल्या जड्डूला धोनीकडून मिळाला ‘हा’ गुरुमंत्र, मग चोप चोपल्या धावा
तू कसोटीसाठी सज्ज आहेस; पुजाराच्या शब्दांनी भारावला होता ‘हा’ ३२७ बळी घेणारा गोलंदाज