---Advertisement---

कसोटी चॅम्पियनशीप फायनल: टीम इंडियाचे ‘असे’ ३ निर्णय, ज्यामुळे उंचावतील तुमच्याही भुवया

On: सोमवार, मे 31, 2021 11:40 PM
---Advertisement---

येत्या जून महिन्यात आईसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाचा अंतिम सामना होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते उत्सुक असून त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. १८ जूनपासून सुरु होणारा हा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. दोन्हीही संघांना या महत्त्वाच्या सामना विजयाचे प्रबळ दावेदार म्हटले जात आहे.

भारतीय संघाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास अगदी चांगला झाला आहे. परंतु दरम्यान अंतिम सामन्यात त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या न्यूझीलंड संघाकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट अशी राहिली. हीच कामगिरी आपण सर्वांस अंतिम सामन्यातही पाहण्यास मिळू शकते.

परंतु भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा महत्त्वाचा जिंकण्याच्या दृष्टीने अंतिम ११ जणांच्या पथकात काही बदल करू शकतो. कोहलद्वारे घेण्यात येऊ शकणाऱ्या काही अचंबित निर्णयांवर सविस्तर चर्चा आपण या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर सुरू करुया…

३. शार्दुल किंवा सिराजला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून जागा
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या त्रिकूटावर जास्त विश्वास दाखवला आहे. अंतिम सामन्यातसुद्धा या त्रिकुटासह भारतीय संघ मैदानात उतरेल अशी आशा आहे. परंतु, विराट कोहली काहीतरी नवीन योजना करू शकतो, जेणेकरून समोरच्या संघाला गुंडाळता येईल. मोहम्मद सिराजकडे भेदक मारा तसेच आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याची क्षमता आहे. याबरोबरच यॉर्कर चेंडूसुद्धा टाकण्याची शैली त्याचाकडे चांगली आहे. शार्दुल ठाकूरकडे चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. शार्दुलकडे फलंदाजीचेसुद्धा कौशल्य आहे. यामुळे तो अंतिम सामन्यात आपली जागा पक्की करू शकतो.

अशात कोहलीने तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून सिराज किंवा ठाकूरला संधी दिल्यास इशांत, शमी आणि बुमराहपैकी एकाला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

२. पाचव्या क्रमांकासाठी रिषभ पंतची निवड
अंतिम सामन्यात खेळत असणारा यष्टीरक्षक म्हणजे रिषभ पंत. पंतने गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये उत्कृष्ट असे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. पंतने ६ नंबरवर फलंदाजी करून खुप चांगली खेळी खेळली आहे. त्यामुळे कर्णधार कोहली पंतला वरच्या क्रमांकावर संधी देऊ शकतो. अर्थाच उपकर्णधार अजिंक्य रहाणेला ६ नंबरवर पाठवून पंतला ५ नंबरवर खेळवले जाऊ शकते.

१. अश्विनकडून पावरप्लेत गोलंदाजी
इंग्लंडसारख्या परिस्थितीत डावाची सुरुवात फिरकीपटूकडून करवून घेणे हे जरा विचित्र वाटेल. पण, फिरकीपटू आर अश्विन लाल चेंडू फिरवण्यात तितकाच माहीर आहे आणि असे कारनामे करताना आपण त्याला खूपवेळा पहिलेसुद्धा आहे. गेल्या इंग्लंड दौऱ्यात  आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनला पावरप्लेमध्ये बळी घेताना आपण पाहिले आहे. याखेरीज अश्विन डावखुऱ्या फलंदाजासाठी डोकेदुखी ठरतो. त्यामुळे न्यूझीलंडच्या डावखुर्या फलंदाजांसमोर नवीन चेंडूने अश्विनचा खूप फायदा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

मास्टर ब्लास्टरचा ‘हा’ विश्वविक्रम धोक्यात, जेम्स एंडरसन येत्या मालिकेत करणार आपल्या नावे

खेळाडूंची सुरक्षा ते टी२० विश्वचषकाची तयारी; ‘या’ कारणांमुळे युएईत आयपीएल घेण्याचा निर्णय योग्य

WTC Final: रोहित-शुबमनची सलामी जोडी भारतासाठी चिंतेचा विषय, माजी खेळाडूचे परखड मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---