---Advertisement---

टीम इंडिया परदेशात पराभूत होण्याच खरं कारण हे तर नसावं???

---Advertisement---

क्राईस्टचर्च। आजपासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव 63 षटकात 242 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

भारताने या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही नाणेफक हारली होती. तसेच हा सामनाही भारत 10 विकेट्सने पराभूत झाला. त्यामुळे परदेशात खासकरुन आशिया खंडाबाहेर नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे असल्याचे मागील काही वर्षात अधोरेखीत झाले आहे.

मागील काही मालिकांचा विचार करता भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये नाणेफेक जिंकलेले सर्व कसोटी सामने भारताने जिंकलेही आहेत.

भारताने 2018 ला केलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ जोहान्सबर्गला झालेल्या सामन्यात विराटने नाणेफेक जिंकली होती. विशेष म्हणजे हा सामनाही भारताने जिंकला होता. तर नाणेफक पराभूत झालेल्या अन्य दोन सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले होते.

त्यानंतर 2018लाच ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकाही सामन्यात कर्णधार विराटला नाणेफेक जिंकता आली नाही. या मालिकेतील 4 सामन्यात भारताने पराभव स्विकारला तर 1 सामन्यात भारताने नाणेफेक हरल्यानंतरही सामन्यात विजय मिळवला होता.

यानंतर डिसेंबर 2018 – जानेवारी 2019 दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटने 3 सामन्यात नाणेफेक जिंकली. या मालिकेत नाणेफेक जिंकलेल्या सामन्यांपैकी भारताने ऍडलेड आणि मेलबर्न कसोटीत विजय मिळवला. तर सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. तसेच या मालिकेतील पर्थला झालेल्या कसोटी सामन्यात विराटने नाणेफेक हारली होती. याबरोबरच हा सामनाही भारताने हारला होता.

ही आकडेवारी लक्षात घेता मागील काहीवर्षात आशिया खंडाबाहेर भारतासाठी नाणेफेक महत्त्वाची ठरली असल्याचे लक्षात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---