भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बाॅलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्माने केरळमधील महापूरग्रस्तांसाठी मोठी मदत पाठवली आहे.
औषध आणि अन्नाने भरलेला ट्रक विरुष्काने महापुरात बाधीत झालेल्या प्राण्यांसाठी पाठविला आहे.
तसेच या जोडीने स्थानिक एनजीओच्या मदतीने तेथील प्राण्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
तिसरी कसोटी जिंकल्यावर विराटने हा विजय केरळमधील पुरग्रस्तांसाठी समर्पित केला होता. तो म्हणाला होता, “आम्ही संघ म्हणून हा विजय केरळमधील महापूरग्रस्तांना समर्पित करत आहोत. तिथे हा खूप कठिण काळ आहे आणि त्यांच्यासाठी हे आम्ही करु शकतो.”
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती
–विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका
–इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश





