भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान आशिया चषकातील सुपर फोर सामना खेळला गेला. या सामन्यात सलामीला उतरलेल्या विराट कोहलीने तब्बल 1020 दिवसांनी आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. आपले हे बहुप्रतिक्षित शतक त्याने आपली पत्नी अनुष्का शर्मा व मुलगी वामिका यांना अर्पण केले.
भारतीय डावानंतर विराट कोहली याने समालोचकांशी संवाद या संवादात बोलताना त्याने आपण शतक आपली पत्नी व मुलीला अर्पण करत असल्याचे म्हटले. विराट म्हणाला,
”हा आनंदी क्षण होता. मी जल्लोष करताना माझ्या गळ्यातील रिंगला चुंबन केले. मी हे शतक त्याच दोन व्यक्तींना अर्पण करू इच्छितो, ज्या या संपूर्ण वाईट काळात माझ्या पाठीमागे उभ्या होत्या. त्या व्यक्ती म्हणजे माझी पत्नी अनुष्का व मुलगी वामिका”
विराटने या सामन्यात एकूण अवघ्या 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले.