कोलकाता। भारताने बांगलादेश विरुद्ध इडन गार्डनवर झालेल्या दिवस-रात्र कसोटीत आज एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील सलग 7 वा विजय होता. त्यामुळे भारताने पहिल्यांदाच सलग 7 कसोटी विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे.
तसेच कर्णधार म्हणून सलग 7 कसोटी विजय मिळवणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराला सलग 7 कसोटी विजय मिळवता आले नव्हते.
सलग सात कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार.#म #मराठी #INDvBAN @Maha_Sports @kridajagat
— Aditya Gund (@AdityaGund) November 24, 2019
भारताने ऑगस्ट 2019 पासून आत्तापर्यंत हे 7 कसोटी विजय मिळवले आहेत. यामध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या 2 विजयांचा, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 विजयांचा आणि बांगलादेश विरुद्ध मिळवलेल्या 2 विजयांचा समावेश आहे.
भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडली ही घटना
वाचा????https://t.co/B7zFcJqvai????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest— Maha Sports (@Maha_Sports) November 24, 2019
कोहलीच्या टीम इंडियाचा विश्वविक्रम; कोणालाही न जमलेली गोष्ट करुन दाखवली!
वाचा????https://t.co/AuNbu8fevD????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest— Maha Sports (@Maha_Sports) November 24, 2019






