भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आजपासून(24 फेब्रुवारी) दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे सुरु आहे. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने इतिहास घडवला आहे.
विराटने या सामन्यात 12 वी धाव घेताच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 500 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच नाही तर कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 500धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला.
आत्तापर्यंत कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध 500 धावा करता आल्या नव्हत्या.
विराट हा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 मध्ये खेळताना 15 सामन्यात 512 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 5 अर्धशतकांचाही समावेश आहे.
मात्र आज विराटला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. त्याने आज 17 चेंडूत 24 धावा केल्या. यात 3 चौकार मारले. त्याला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पाने बाद केले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
512 – विराट कोहली (15 सामने)
378 – जेपी ड्यूमिनी (15 सामने)
366 – कमरान अकमल (12 सामने)
335 – उमर अकमल (12 सामने)
318 – रोहित शर्मा (19 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताकडून आज पदार्पण करणारा कोण आहे मयंक मार्कंडे…
–धवनला विश्रांती, पहिल्या टी२० साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–विराट कोहलीच्या मते हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे सर्वात धोकादायक