---Advertisement---

विंडीजनंतर झिम्बाब्वे दौऱ्यातूनही विराट आऊट, आता थेट ‘तेव्हाच’ करणार पुनरागमन?

On: रविवार, जुलै 31, 2022 12:06 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी झिम्बाब्वे विरुद्ध १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेतून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत केएल राहुल आणि विराट कोहली दिसणार नाहीत. स्वत: केएल राहुलने ट्विटरवर परतण्यास उशीर होण्याचे कारण दिले आहे. पण, विराट कोहलीच्या अनुपस्थितीबाबत स्थिती स्पष्ट नाही.

झिम्बाब्वे दौऱ्यातून विराट कोहली टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, अशा बातम्या सतत येत होत्या. पण, संघ जाहीर झाला तेव्हा विराटचे नाव नव्हते. त्याला विश्रांती देण्यात आली आहे की आणखी काही कारण आहे हेही बीसीसीआयने सांगितले नाही.विराटची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडमध्ये ६ डावात फलंदाजी केली आणि २० धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्यानंतर त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.

विराट आशिया कपमधून परतणार आहे
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार कोहली ऑगस्टच्या अखेरीस होणाऱ्या आशिया कपमधून संघात पुनरागमन करू शकतो. एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “विराटने निवडकर्त्यांशी बोलले होते की तो आशिया चषकासाठी उपलब्ध असेल. आशिया चषकापासून टी-२० विश्वचषकापर्यंत संघातील वरिष्ठ खेळाडूंना क्वचितच विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे विंडीज दौऱ्यानंतर आता फक्त दोन आठवड्यांची खिडकी उरली आहे ज्यामध्ये वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेऊ शकतात.यामुळेच विराटने झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून पुढील ३-४ महिन्यांच्या व्यस्त क्रिकेट शेड्यूलपूर्वी ब्रेक घेऊन तो स्वत:ला रिफ्रेश करू शकेल.”

झिम्बाब्वे दौऱ्यात काही खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे, जे दीर्घकाळ दुखापतीमुळे संघाबाहेर होते. त्यात वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर हे गोलंदाज आहेत. वॉशिंग्टन सध्या लँकेशायरकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे. त्याचवेळी, हॅमस्ट्रिंग आणि पाठीच्या दुखापतीतून मुक्त पूर्ण करून दीपक चहर भारतीय संघात परतला आहे. चहर ६ महिन्यांपासून भारतीय संघापासून दूर आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२२मध्ये खेळू शकला नाही. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीनही एकदिवसीय सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर चार दिवसांनी (२७ ऑगस्ट) आशिया चषक सुरू होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मी माझ्या मनाचं ऐकलं अन् जे झालं ते…’, अर्शदीप सिंगने सांगितलं पडद्यामागील रहस्य

‘लवकरच पुनरागमन करणार’, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहिर होताच केएल राहुलने केली भावनिक पोस्ट

भारत पाकिस्तान एजबॅस्टन वर भिडणार, आपण मात्र ‘या’ ठिकाणी सामना पाहणार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---