बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने विजय मिळवला. ढाकामध्ये झालेल्या या सामन्यात भारताने आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या महत्वपूर्ण खेळीने रोमांचक विजय मिळवला. भारताने या विजयाने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेत भारताचा अनुभव फलंदाज विराट कोहली हा फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र, मालिकेनंतर त्याने केलेल्या एका कृतीमुळे सर्वजन त्याचे कौतुक करत आहेत.
ढाका येथे झालेली ही कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाला अखेरच्या डावात केवळ 145 धावांचे आव्हान होते. मात्र त्यासाठी भारतीय संघाला आपले 7 गडी गमवावे लागले. बांगलादेशचा अष्टपैलू मेहदी हसन मिराज याने पाच भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत सामना रोमांचक बनवला होता. त्याने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अक्षर पटेल व जयदेव उनाडकत यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या याच शानदार कामगिरी प्रभावित झालेल्या विराट कोहली याने त्याला एक खास भेट दिली. सामन्यानंतर विराटने मिराज याला स्वतःची स्वाक्षरी केलेली जर्सी भेट केली. विराटने दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीमुळे सर्वजण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
Facebook post by Mehidy about Virat Kohli. pic.twitter.com/fVg3CNfHWb
— Johns. (@CricCrazyJohns) December 25, 2022
मिराज हा भारतीय संघाला या दौऱ्यावर चांगलाच त्रासदायक ठरला. भारतीय संघाला दौऱ्यावरील वनडे मालिकेत दोन सामने गमवावे लागले होते. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात मिराज हाच सामनावीर होता. त्याने एका सामन्यात अर्धशतक तर दुसऱ्या सामन्यात शतक झळकावलेले. त्यानंतर कसोटी मालिकेतही त्याने आपली हीच कामगिरी सुरू ठेवलेली. दुसरीकडे विराट हा या दौऱ्यावर फारशी कमाल करू शकला नाही. वनडे मालिकेतील तिसरा सामना वगळता तो इतर सर्व सामन्यांमध्ये अपयशी ठरला.
(Virat Kohli Gifts Signed Jersey To Mehady Hasan Miraz After Dhaka Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
VIDEO: सामना जिंकताच अश्विनचा एकच जल्लोष! ड्रेसिंग रूममधील विराट, राहुलची रिऍक्शन व्हायरल