लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 3 बाद 58 धावा केल्या आहेत. तसेच भारताला अजुन विजयासाठी 406 धावांची गरज आहे.
या डावात भारताचा कर्णधार विराट कोहली शून्य धावेवर बाद झाला. त्याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. मात्र यामुळे विराटला एका खास विक्रमापासून आवघ्या 9 धावांनी दूर रहावे लागले.
विराटने या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 593 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची आणि द वॉल राहुल द्रविडच्या 602 धावांचा विक्रम मोडण्याची संधी होती. परंतू त्याला या डावात एकही धाव करता न आल्याने त्याची ही संधी हुकली आहे.
असे असले तरी मात्र तो या विक्रमाच्या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने माजी महान फलंदाज सुनील गावस्करांचा 542 धावांचा विक्रम मोडला आहे.
तसेच तो चौथ्या सामन्यादरम्यानच इंग्लंडमध्ये एकाच कसोटी मालिकेत 500 धावा करणारा तो केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला होता.
द्रविडने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या 602 धावा या इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहेत.
तसेच या विक्रमाच्या यादीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये द्रविडचे नाव दोन वेळा आहे. द्रविडने 2011 च्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतही 461 धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आले असून त्यांनी 1979 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत 542 धावा केल्या होत्या.
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाचव्या स्थानी आहे. सचिनने 1996 ला झालेल्या कसोटी मालिकेत 428 धावा केल्या होत्या. यात त्याने दोन शतके आणि 1 अर्धशतक केले होते.
इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज-
602 धावा – राहुल द्रविड (2002)
593 धावा – विराट कोहली (2018)
542 धावा – सुनील गावस्कर (1979)
461 धावा – राहुल द्रविड (2011)
428 धावा – सचिन तेंडुलकर (1996)
थोडसं खास-
जेव्हा 1930मध्ये आॅस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यावर आली होती तेव्हा सर डाॅन ब्रॅडमन यांनी 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 7 डावात फलंदाजी करताना 974 धावा केल्या होत्या. कोणत्याही कसोटी मालिकेत, कोणत्याही देशात केलेल्या या सर्वोच्च धावा आहे.
एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताकडून सुनिल गावसकरांच्या नावावर आहे. त्यांनी 1970-71ला विंडीजविरुद्ध विंडीजमध्ये 4 कसोटीत 8 डावात फलंदाजी करताना 774 धावा केल्या होत्या. तसेच गावसकरांनी 1978-79मध्ये भारतात विंडीजविरुद्ध 6 सामन्यात 732 धावा केल्या होत्या. तर विराटने बाॅर्डर -गावसकर मालिकेत आॅस्ट्रेलियात 4 सामन्यात 8 डावात फलंदाजी करताना 692 धावा केल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप ५: शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अॅलिस्टर कूकने केले हे खास विक्रम
–Video: हनुमा विहारी केला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांच्याबरोबर असलेल्या खास नात्याचा खुलासा