भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली होती. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर त्याने भारतीय टी-२० संघाच्या कर्णधार पदावरून राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय स्वतःवरचा दबाव कमी करण्यासाठी आणि फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे. परंतु हे बदल वनडे स्वरूपातील नवीन सेटअपशी जोडले जाऊ शकतात. विराटने स्पष्ट केले आहे की, तो भविष्यात वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करत राहील. परंतु आगामी २०२३ विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो वनडे संघाच्या कर्णधारपदावर टिकून राहणे देखील कठीण झाले आहे.
विराटने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत कामाचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. परंतु वृत्तसंस्था पीटीआयसोबत बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने दावा केला आहे की, विराटने कर्णधारपदाचा राजीनामा नाही दिला; तर त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.
तसेच सूत्राने असा देखील दावा केला आहे की, विराटची अशी इच्छा होती की, रोहितला टी२० संघाच्या उपकर्णधार पदावरून काढून केएल राहुलला उपकर्णधारपद देण्यात यावे. कारण रोहित आता ३४ वर्षांचा झाला आहे. परंतु बोर्डाने असे करण्यास नकार दिला होता. यावरुन बोर्डाचे अधिकारी त्याच्यावर नाराज आहेत.
तसेच पीटीआयसोबत बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “विराटला माहीत होते की,भारतीय संघाने जर युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली तर त्याला मर्यादित षटकातील संघाच्या कर्णधारपदावरून काढले जाईल. त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणे हे भारतीय संघासाठी चांगलेच आहे. असे करून त्याने स्वतःवर असलेला दबाव देखील कमी केला आहे. पण अद्याप त्याच्या वनडे संघाच्या नेतृत्त्वपदाबाबत असे झाले नाहीये. परंतु टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याची निराशाजनक कामगिरी सुरू राहिली तर, त्याला वनडे संघाचे कर्णधारपद देखील गमवावे लागू शकते.” (Virat Kohli quits T20 captaincy bcci would have removed if T20 world cup won’t happened in favor)
तसेच सूत्राने पुढे म्हटले की, “बोर्डाने जर येणाऱ्या काळात विराटला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला, तर यात काहीच आश्चर्यकारक नसेल. कारण हे भारतीय क्रिकेट आहे, जिथे खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल; तर त्याचे नशीब बदलायला जास्त वेळ लागत नाही. जर त्याला टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात अपयश आले; तर त्याला वनडे क्रिकेटमध्ये देखील एक फलंदाज म्हणून खेळावं लागेल.”
तसेच सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला ड्रेसिंग रूममधूनही पूर्ण समर्थन मिळत नाहीये. रोहित शर्माला या संघाचे लीडर म्हणून पाहिले जात आहे. रोहितने आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस जेतेपद पटकावून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रोहितला उपकर्णधारपदावरुन काढून टाका’, वाचा कर्णधार कोहली घेणार होता रोहितची विकेट?
‘इंग्लंडच्या खेळाडूने बुमराहला अशी शिवी दिली, जी सर्वांपुढे सांगताही येणार नाही’, शार्दुलचा उलगडा