भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणला जातो. तर दुसरीकडे विराटची पत्नी अनुष्का शर्मा देखील आपल्या अभिनयाच्या क्षेत्रात खूप पुढे आहे. ते दोघेही नेहमी एकमेकांची प्रसंशा करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच एका पॉडकास्टमध्ये मार्क निकोलस यांच्यासोबत केलेल्या चर्चा सत्रात विराटने अनुष्काचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
निकोलस यांनी विराटला प्रश्न विचारला की, मैदानावर असताना तू तणाव कसा कमी करतो? याबद्दल बोलताना विराटने म्हटले की, “या बाबतीत ७० टक्के तुमची टेकनिक असते तर ३० टक्के तुमचा माईंड गेम असतो. जेव्हाही खेळण्याची गोष्ट येते, तेव्हा माझ्या चांगल्या कामगिरीमागे अनुष्का एका मजबूत स्तंभाप्रमाणे उभी राहिली आहे. ती माझा आभारस्तंभ आहे”
अनुष्काबद्दल पुढे तो म्हणाला, “तीसुद्धा तिच्या क्षेत्रात त्या उचींवर आहे, जिथे तिला देखील नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो. यामुळेच ती माझी स्थिती समजू शकते. एक असा जोडीदार असणं, ज्याला माहीत असतं तुमच्या मनात काय सुरू आहे, तुम्ही काय अनुभवत आहात आणि कुठल्या परिस्थितिचा तुम्ही सामना करत आहात, ही फार चांगली बाब आहे.”
एका जाहिरातीच्या चित्रीकरण होत असताना हे दोघेही सोबत काम करत होते. आणि त्यांनतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही लग्नबंधनात अडकले. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांना कन्यारत्न प्राप्ती देखील झाली आहे. त्यांनी तिचे नाव ‘वमिका’ असे ठेवले आहे.
सध्या सुरू असलेल्या इंग्लंडच्या भारत दौऱ्यात विराट कोहली भारतीय संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत का इंग्लंड, अहमदाबाद कसोटीत कोणाचे पारडे जड? इंग्लिश दिग्गजाने सांगितले नाव
अन्यथा संघाच्या नावातून ‘हैदराबाद’ काढून टाकावे लागेल; माजी मंत्रींची ‘ऑरेंज आर्मी’ला धमकी
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ‘या’ २ बदलांसह उतरेल टीम इंडिया, पाहा संभावित प्लेइंग XI