यावर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद इंग्लंडने पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि इंग्लंड इतिहासात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता बनला. भारतीय संघ मात्र उपांत्य सामन्यातच इंग्लंडकून पारभूत झाला. पराभवानंतर भारतीय संघावर सर्व बाजूंनी टीका होताना दिसल्या. यादरम्यानच माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. कुंबळेंच्या मते कसोटी आणि मर्यादित षटकांसाठी भारताचे दोन वेगवेगळे संघ असले पाहिजेत.
अनिल कुंबळे (Anil Kumble) टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारताला मिळालेल्या अपयशानंतर माध्यमांशी बोलत होते. माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की, “तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या संघांची गरज आहे. मला वाटते इंग्लंडने हे दाखवून दिले आहे. एवढेच नाही मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात विजेता बनलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दाखवून दिले की, तुमच्याकडे जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू पाहिजेत. तुम्ही त्यांच्या फलंदाजी क्रमाकडे लक्ष दिले पाहिजे.”
“लियाम लिविंगस्टोन सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. कोणत्याही इतर संघाकडे सातव्या क्रमांकावर लिविंगस्टोनसारखा फलंदाज नाहीये. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस स्टॉयनिस सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तुम्हालाही अशा पद्धतीचा संघ बनवला पाहिजे,” असे कुंबळे पुढे बोलताना म्हणाला.
अनेकजण कसोटी आणि मर्यादित षटकांसाठी दोन वेगवेगळे संघ बनवण्यासोबतच दोन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या प्रशिक्षकांची देखील मागणी करत अशतात. मात्र कुंबळेंनी यासाठी कुठलाच आग्रह धरल्याचे दिसत नाही. ते पुढे बोलताना म्हणाले की, “संघाला कर्णधार किंवा प्रशिक्षक वेगवेगळे हवेत, याविषयी मी निश्चित काही बोलणार नाही. तुम्ही कोणत्या संघासोबत खेळाल, यावरून या सर्व गोष्टी ठरवल्या जाऊ शकतात. त्यानंतर ठरवले जाईल की, तुम्हाला कोणत्या प्रकाराच सपोर्ट स्टाफ आणि कर्णधार गरजेचा आहे.”
दरम्यान, टी-20 विश्वचषकात भारताचे प्रदर्शन पाहिले, तर ते चांगले होते. ग्रुप स्टेजच्या पाच सामन्यांतील चार सामने भारताने जिंकले आणि ग्रुप दोनमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला. उपांत्य सामन्यात मात्र त्यांना इंग्लंडकडून 10 विकेट्सचा मोठा पराभव मिळाला. (‘We should make a team like them’, Anil Kumble’s advice to Team India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’
पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेल्या सॅमीने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण; म्हणाला…