समजा कसोटी सामना सुरूये, खेळाडू धावा करत आपल्या शतकाच्या दिशेने वेगाने पुढे पुढे जातोय, पण तेव्हाच त्याला चक्कर आली तर…? अशी परिस्थिती उद्भवू नये, तसेच तंदुरुस्ती चांगली राहावी म्हणून खेळाडू खाण्या-पिण्याची किती जास्त काळजी घेतात. सामन्यादरम्यान लंच ब्रेक, टी- ब्रेक यांसारख्या ब्रेकदरम्यान खेळाडू नेमकं काय खातात? हा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. तर या लेखातून आपण तेच जाणून घेऊ.
कसोटी क्रिकेटमध्ये जगभरातील खेळाडूंची कसोटी लागलेली असते. कारण या क्रिकेट प्रकारात खेळाडूंच्या फिटनेसची परीक्षाच घेत असते. ५ दिवस चालणाऱ्या या सामन्यात दरदिवशी ३ सत्र खेळवले जाते. हे सत्र खेळाडूंच्या विश्रांतीसाठीच ठेवलेले असतात. कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या २ तासांच्या खेळानंतर खेळाडूंना लंच ब्रेक मिळतो. यानंतर खेळाडू पुन्हा २ तास खेळल्यानंतर टी-ब्रेकसाठी जातात. टी-ब्रेक झाल्यानंतर पुन्हा अडीच तासांचा खेळ असतो. आता इतका वेळ मैदानावर टिकून राहण्यासाठी खेळाडूंना त्या दर्जाचे खानपान मिळणे गरजेचं असतं. यासोबत महत्त्वाचं असतं ते म्हणजे खेळाडू सकाळी काय खाऊन मैदानावर उतरलेत?
तर कसोटी सामन्यापूर्वी खेळाडू सर्वात चांगला ब्रेकफास्ट घेतात. त्यात ते सकाळी दुधाबरोबर सीरियल, पास्ता आणि फळे घेतात. याव्यतिरिक्त काही खेळाडू मांस, सलाद आणि जॅम किंवा पीनट बटरसोबत सँडविचदेखील खातात. पहिल्या सत्रानंतर खेळाडू जेव्हा लंचसाठी जातात, तेव्हा खेळाडूंना लंचमध्ये ३ ते ४ प्रकारच्या डिशेस दिल्या जातात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्यांसह हिरव्या पालेभाज्या, शिजवलेले बटाटे आणि दाळ या गोष्टी मुख्य असतात. आता सगळेच खेळाडू शाकाहारी असतात असं नाहीये. काही खेळाडूंना मांसाहारी पदार्थही आवडतात. मांसाहार खाणाऱ्या खेळाडूंसाठी चिकन, मासेही असतात. याव्यतिरिक्त अधिकतर खेळाडूंची आवडती आईसक्रीमही दिली जाते.
भारतीय संघाचा माजी खेळाडू नयन मोंगियाने एका मुलाखतीत सांगितलेलं की, “काय खायचं आणि काय नाही खायचं हे खेळाडू ठरवतात.” हे सर्व या गोष्टीवर अवलंबून असते की, खेळाडू पुढच्या सत्रात मैदानावर जाणारे की नाही. जे खेळाडू त्या सत्रात फलंदाजी करतात, ते अधिकतर फळे किंवा प्रोटीन बार खातात. खेळाडू जे काही खातात, त्यामध्ये फॅटचे प्रमाण कमी आणि कार्बोहाइड्रेटचे प्रमाण जास्तच असते. हे आटोपल्यानंतर खेळाडू भारतातली सर्वात आवडती गोष्ट म्हणजे चहा पिण्यासाठी जातात. पूर्वी चहा थेट मैदानावर खेळाडूंना दिला जायचा. मात्र, नंतर नियम बदलले गेले.
लंचनंतर २ तासांचा खेळ झाल्यावर खेळाडू पुन्हा एकदा फ्रेश होण्यासाठी मैदानातून बाहेर जातात. यावेळी खेळाडू चहा किंवा कॉफीसोबतच हलकाफुलका नाश्ताही करतात. कारण, हे पदार्थ लगेच पचतात.
महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंचे जेवण बनवण्यासाठी आणि खेळाडूंना जी कोणती गोष्ट खाण्यासाठी दिली जाते, ती तज्ञ शेफने बनवलेली असते. महत्त्वाचे म्हणजे काही खेळाडू तर स्वत:चा शेफही ठेवतात. त्यामुळेच इतर खेळाडूंना कोणताही त्रास होत नाही. आता दिवसाचा खेळ संपल्यानंतरही खेळाडू आपल्या खानपानाच्या बाबतीत निष्काळजीपणा करत नाहीत. ते डिनरच्या वेळीही एनर्जी देणारे पदार्थच खातात. यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाडू स्पा, मालिश आणि बाथटबमधील अंघोळीची मजाही घेतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
विराट आणि सचिन यांच्यातील नाते सांगणारे ४ भन्नाट किस्से
सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू! कशी राहिली त्याची क्रिकेटमधील आकडेवारी, जाणून घ्या एका क्लिकवर