भारतात क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेकदा चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असतात. असेच एकदातर चक्क चाहत्यांनी भारत हरणार असे वाटून चाहत्यांनी चक्क स्टेडियममध्ये आग लावली होती. या घटनेमुळे पुढे खूप चर्चा झाली होती.
ही घटना १९९६ च्या विश्वचषकादरम्यान घडली होती. १३ मार्चला भारत विरुद्ध श्रीलंका संघात कोलकाताच्या इडन गार्डनवर उपांत्य सामना सुरु होता. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंका संघाने ५० षटकात ८ बाद २५१ धावा करत भारताला २५२ धावांचे आव्हान दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताने नवज्योत सिंग सिद्धूची विकेट ८ धावांवरच गमावली. पण त्यानंतर सचिन तेंडूलकर आणि संजय मांजरेकरांनी भारताचा डाव सांभाळला. मात्र सचिन ६५ धावा करुन बाद झाला. त्यावेळी भारतीय संघ २ बाद ९९ धावा अशा स्थितीत होता. पण त्यानंतर भारताचा डाव ढासळला. पुढच्या काही षटकातच १२० धावात ८ विकेट्स अशी परिस्थिती भारतावर उद्भवली.
त्यामुळे चाहत्यांना वाटले आता भारताने हा सामना जिंकणे कठीण आहे. त्यामुळे चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. त्यांनी पाण्याच्या बॉटल्स मैदानावर फेकण्यास सुरुवात केली. ते पाहुन सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण स्टेडियममधील प्रेक्षक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी स्टेडियममध्येच आग लावली. यामध्ये काही आसनांनाही आग लागली.
या घटनेमुळे सामनाधिकाऱ्यांनी सामना त्याच परिस्थितीत थांबवला आणि काही वेळाने श्रीलंकेला विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे श्रीलंका अंतिम सामन्यात पोहचले. पुढे जाऊन श्रीलंकेने तो विश्वचषकही जिंकला. यानंतर भारतीय क्रिकेटची खूप बदनामी झाली होती. तसेच या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
ट्रेडिंग घडामोडी-
-आयपीएल २०२० आता होणार या महिन्यात?
–दुबईहुन परतलेल्या रायगडच्या ११ क्रिकेटपटूंनी कोरोना टेस्टनंतर ठोकली धूम
–बरोबर ८ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–योग्य ठिकाणी गाडी पार्क न केल्यामुळे धोनीची पत्नी नाराज; पहा व्हिडिओ