परवा-परवा आयपीएलच्या रणांगणात मोठा राडा झाला. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर मॅच झाली. दिल्लीला लास्ट ओव्हरला जिंकायला ३६ रन्स पाहिजे असतानाही एका नो बॉलवरून बराच ड्रामा झाला. दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंतन आपल्या बॅटर्सला बाहेर या म्हणून सांगितले. कोच प्रवीण आमरेंनी तर कहरच केला. ते सरळ ग्राउंडमध्ये गेले अंपायर्सशी वाद घालायला. या घटनेने डोळ्यासमोर पटकन तीन वर्षापुर्वीची घटना आली, जेव्हा क्रिकेटचा कॅप्टन कूल एमएस धोनी असाच अँग्री यंग मॅन बनलेला.
आयपीएलमुळे लोकांना काय काय पाहायला मिळतं याचं ते यथायोग्य उदाहरण होतं. जो धोनी कायम कोणतीही परिस्थिती असताना शांतच राहतो, आपला संयम ढळू देत नाही, त्या धोनीला लोकांनी पहिल्यांदाच रागावलेले पाहिलं, आणि त्यानंतर घडली ती ऐतिहासिक घटना, जिने खरतर आयपीएल, धोनी आणि क्रिकेटच्या जंटलमन्स गेम या नावाला बट्टा लावला.
हेही पाहा- धोनीचा हा अवतार या आधी कधी पाहिलाच नव्हता
ठिकाण होतं जयपूरचं सवाई मानसिंह स्टेडियम. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या रिवर्स फिक्सचरची मॅच. राजस्थननं कसबस १५८ च टारगेट सीएसकेला दिल. धोनी आणि रायडू वगळता सीएसकेच्या अन्या बॅटर्सने माती खाल्ली. लास्ट ओवरला जिंकायला हव्या होत्या १७ रन्स. बॉलिंगला बेन स्टोक्स तर स्ट्राइकवर रविंद्र जडेजा. पहिला बॉल टाकला आणि जडेजाने झोपून तो आयकॉनिक छक्का मारला. पुढचा नोबॉल आणि एक रन. दुसऱ्या बॉलला धोनीने दोन रन काढले अन् स्प्राईट ठेवली. तिसऱ्या बॉलला धोनी क्लिन बोल्ड.
इथपर्यंत सारे काही ठीक चाललेलं. तीन बॉलमध्ये गरज होती ८ रनांची आणि स्ट्राइकवर आलेला मिचेल सॅंटनर. स्टोक्सने टाकलेल्या पुढच्या बॉलवर त्याने दोन रन घेतले, आणि त्यानंतर जे घडलं ते केवळ अविश्वसनीय, अकल्पनीय आणि विचार करण्याच्या पलीकडचं होतं. ऑन फिल्ड अंपायर उल्हास गंधे यांनी तो बॉल कमरेच्यावर फुलटॉस आल्याने नोबॉल दिला. इतक्यात स्क्वेअर लेग अंपायर असलेल्या ब्रूस ऑक्सनफोर्ड यांनी इशारा करत तो नोबॉल नाही, असं म्हटलं. गंधे यांनी त्यांचा सल्ला मानून नो बॉल कॅन्सल केला.
इथे जबरदस्त ट्विस्ट आला. जडेजा आणि सॅंटनर भांडू लागले की, आधी नो बॉल दिला आहे तर, आता कॅन्सल कसे करू शकता. नुकताच आऊट होऊन गेलेला कॅप्टन धोनी पॅड काढून बाऊंड्री लाईनवर आला आणि नो बॉल द्या म्हणू लागला. खरं तर त्या नो बॉलचं महत्व होतं. जडेजा-सॅंटनरने दोन रन पूर्ण केलेले आणि नो बॉल असे तीन रन त्यांना मिळणार होते. प्लस पुढचा बॉलल फ्री-हीट. असं असताना ऑक्सनफोर्ड यांनी जडेजाला समजावत खेळ सुरू करायला लावला.
इतक्यात सर्वांनी असे दृश्य पाहिले ज्याची कोणाला अपेक्षाच नव्हती. एवढा वेळ बाउंड्रीवर उभा असलेला कॅप्टन धोनी सरळ ग्राउंडमध्ये आला. रागाने अगदी लालबुंद झालेला धोनी चालत-चालत दोन्ही अंपायर्सकडे गेला आणि तावातावाने वाद घालू लागला. त्याच्या निशाण्यावर खरतर उल्हास गंधे होते. जवळजवळ चार-पाच मिनिटे हा सारा ड्रामा सुरू होता. धोनी असे काही करेल याची कोणाला कल्पनाही नव्हती. किंबहुना क्रिकेटच्या इतिहासात असं कधी झालंच नव्हतं. फार फार तर सुनील गावसकरांनी १९८१ च्या मेलबर्न टेस्टवेळी अंपायरच्या चुकीचा निर्णयाविरोधात चेतन चौहान यांच्यासह वॉक आऊट केलेला.
पुढे धोनी ग्राउंडमधून बाहेर आला. दोन्ही अंपायर्सनी तो बॉल लीगल धरला, पण विजय त्यादिवशी चेन्नईच्या नशिबात होताच. सॅंटनरने लास्ट बॉलला सिक्स मारून चेन्नईला प्ले ऑफ्समध्ये पोहचवले. एवढी नाट्यमय मॅच होऊनही चर्चा होती फक्त धोनीचीच.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला. धोनी चुकला हे सार्यांनीच म्हटलं. अनेक माजी क्रिकेटर्सने तर धोनीला बॅनच करावे इथपर्यंत म्हटले. त्याच वेळी अनेकांनी खराब अंपायरींगच्या नावाने खडे फोडले. कदाचित धोनीला धोनी असल्याचा फायदा मिळाला आणि शेवटी, पन्नास टक्के मॅच फीचा दंड भरायला लावत हे प्रकरण मिटवले गेले. ज्या धोनीकडे खेळाचा सर्वात मोठा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून पाहिले जाते त्याच धोनीने, असे कृत्य करून जंटलमन्स गेम आणि स्पोर्ट्समन स्पिरिट या शब्दांची किंमत मात्र कमी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शारीरिक व्यंगावर मात करत ‘हे’ ५ क्रिकेटर्स बनले दिग्गज, टीम इंडियाच्या २ खेळाडूंचा समावेश