IND vs SL Second ODI: श्रीलंकेनं रविवारी (4 ऑगस्ट) दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवासह भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध सलग 11 द्विपक्षीय मालिका जिंकण्याची साखळी तुटली. श्रीलंकेने भारताविरुद्ध शेवटचा वनडे मालिका विजय डिसेंबर 1997 मध्ये मिळवला होता. असे असताना दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजीतील बदलांविषयी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी होती. विजयासाठी मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी 97 धावांची सलामी दिलेली. मात्र, त्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला व संघाला पराभव पाहावा लागला. संघाचे प्रमुख फलंदाज असलेल्या श्रेयस अय्यर व केएल राहुल यांच्याआधी शिवम दुबे हा फलंदाजीला आला होता. मात्र, तो खाते देखील खोलू शकला नाही. संघाच्या या रणनीती विषयी बोलताना सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर म्हणाले,
“खेळपट्टीवर चेंडू खूपच जास्त वळत होता. यामध्ये कोणावरही तुम्ही फारसा विश्वास दाखवू शकत नाही. त्यांची गोलंदाजी नक्कीच चांगली होती. मला वाटते की बॅटिंग पोझिशन तेव्हाच महत्त्वाची ठरते, जेव्हा परिस्थिती एकसारखे असते. मधल्या काळात आम्ही पटापट बळी गमावले. असेही शिवम मधल्या फळीतील फलंदाज आहे त्यामुळे तो निर्णय अगदी चुकीचा नव्हता.” शिवमप्रमाणे श्रेयस व राहुल देखील या सामन्यात आपला प्रभाव पाडू शकले नाहीत.
फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर भारतासमोर विजयासाठी 241 धावांचं लक्ष्य होते. मात्र हे लक्ष्य भारतासाठी खूप मोठे ठरले. टीम इंडिया 42.2 षटकांत 208 धावांत गारद झाली. श्रीलंकेकडून फिरकीपटू वेंडरसेने 33 धावांत 6 बळी घेतले. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विनने जेव्हा द्रविडसमोरच केली त्याची नक्कल, माजी प्रशिक्षकाची रिऍक्शन होती पाहण्यासारखी
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं
IND vs SL कर्णधार रोहित शर्मानं रचला इतिहास..! ‘या’ 4 दिग्गजांना पछाडलं