---Advertisement---

ये रे माझ्या मागल्या! ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाज सतत फ्लॉप का होत आहेत?

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. मात्र या सामन्यातही भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियानं 48 धावांत 4 विकेट्स गमावल्या. भारताचे यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंत हे चार प्रमुख फलंदाज बाद झाले आहेत. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियात सतत फ्लॉप का होत आहेत, यामागे अनेक कारणं आहेत. यापैकी तीन प्रमुख कारणं आम्ही तुम्हाला या बातमीत सांगतो.

(3) फलंदाजांमध्ये संयमाचा अभाव – या मालिकेत भारतीय फलंदाजांमध्ये संयमाचा अभाव असल्याचं दिसून आलंय. कोणत्याही भारतीय फलंदाजाला क्रीजवर वेळ घालवायचा नाही. कसोटी क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे. या फॉरमॅटमध्ये संयमानं खेळल्याशिवाय यश मिळणार नाही. आतापर्यंत या मालिकेत भारतीय फलंदाजांमध्ये या गोष्टीचा अभाव दिसतोय. सर्व फलंदाज खूपच घाईत दिसत आहेत.

(2) दृष्टिकोनात बदल – टीम इंडियाच्या फलंदाजांच्या दृष्टिकोनातही बदल झाला आहे. आता टीम इंडियाचे फलंदाज वेगानं धावा काढण्याकडे लागले आहेत. भारतीय फलंदाजांना 100 चेंडूत 25-30 धावा करायच्या नाहीत. त्याऐवजी, प्रत्येक खेळाडू कमीत कमी चेंडूंत जास्तीत जास्त धावा करायच्या प्रयत्नात आहे. सर्व फलंदाजांना आक्रमक खेळायचं असून यामुळे त्यांच्या विकेट जात आहेत.

(1) खराब शॉट सिलेक्शन – हे भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमागंच सर्वात मोठं कारण आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भलेही चांगली गोलंदाजी केली असेल, परंतु भारतीय फलंदाजांचं शॉट सिलेक्शनही खूपच खराब राहिलं आहे. गाबा कसोटी सामन्यावर नजर टाकली, तर ज्या बॉलवर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल आऊट झाले, ते बॉल विकेट मिळण्यासारखे अजिबात नव्हते. तसेच विराट कोहली ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू देखील तो सोडू शकला असता. भारतीय संघात अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी खराब फटके खेळून आपल्या विकेट गमावल्या.

हेही वाचा – 

गाबा कसोटीत रोहित शर्मानं केल्या या 3 मोठ्या चुका, कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह
जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलियात जलवा, लवकरच मोडणार कपिल देवचा मोठा रेकॉर्ड
फॅब 4 च्या शर्यतीत खूप मागे पडला ‘किंग’, एकेकाळी होतं निर्विवाद वर्चस्व!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---