यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी केली आहे. भारतानं साखळी सामन्यात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका या संघांचा धुव्वा उडवला आणि यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर 8 साठी जागा पक्की केली. भारताचा चौथा साखळी सामना कॅनडाविरुद्ध खेळला जाणार होता. परंतु पावसानं खोळंबा घातल्यानं हा सामना रद्द करण्यात आला. भारत सुपर 8 चा पहिला सामना (20 जून) रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. परंतु या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळाल्यास कोणत्या खेळाडूचा होणार पत्ता कट?
ईसपीएनक्रिकइन्फो शो दरम्यान स्टीफन फ्लेमिंग भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल चर्चा करताना म्हणाले की, “आतापर्यंत असं झालं नाही. परंतु आता फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना भारतीय संघात संधी मिळत आहे. तुम्ही प्रत्येक परिस्थिती जाणून घेण्यासाठी संघात बदल केले पाहिजेत. मला वाटतं आहे की, फिरकी गोलंदाजीची आक्रमकता दाखवण्यासाठी भारत कुलदीप यादवला संघात संधी देईल. आता या स्पर्धेचा शेवट होईपर्यंत खेळपट्टीवर चेंडू जास्त फिरताना दिसेल. त्यामुळे कुलदीपला संघात दिली पाहिजे.”
पुढे बोलताना स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, “खूप वेळा दोन्ही सारख्याच दोन्ही फिरकीपटूंना संघात घेऊन खेळणं थोडं अवघड असतं. परंतु मिचेल सेंटनर आणि रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) खेळताना दोघांची भूमिका सारखीच आहे. खेळाडू निवडण्याच्या वेळी तुम्हाला विचार करावा लागतो की, तुम्ही 8 ओव्हर एकसारखी गोलंदाजी चालवणार आहात का? परंतु जडेजाचा भारतीय संघानं योग्यवेळी वापर केला तर, सुपर 8 मध्ये भारतीय संघ खूप मजबूत संघ बनेल.”
परंतु भारतीय संघानं सुपर 8 मध्ये कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी दिली तर रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) पत्ता कटू शकतो. कारण साखळी सामन्यात जडेजा आणि अक्षर पटेल (Axar Patel) हे दोन फिरकीपटू भारताकडे होते. पण जडेजा काहीच खास कामगिरी करु शकला नाही. अक्षर पटेलनं त्याच्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न? युगांडाच्या खेळाडूची आयसीसीकडे तक्रार
भारतासह हे 12 संघ टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र; सुपर-8 साठी पात्र न झालेल्या पाकिस्तानचं भविष्य काय?
टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू, टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही!