भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर असे दिसून येते की ज्या खेळाडूने आपल्या कौशल्यांचा योग्य वापर करत चांगली कामगिरी केली, त्याच खेळाडूला पुढे भारतीय संघात संधी मिळाल्या. त्याचबरोबर ज्यांना आपली कामगिरी सिद्ध करता आली नाही, त्यांना काही सामन्यानंतर संघातून वगळण्यात येते. अशाप्रकारे त्या खेळाडूंचे नाव फ्लॉप खेळाडूंमध्ये सामील होते. याव्यतिरिक्त खेळाडू फ्लॉप जरी असले, तरी त्यांच्या पत्नी मात्र अतिशय सुंदर आहेत.
या लेखात आपण त्या ५ फ्लॉप भारतीय खेळाडूंच्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या अतिशय सुंदर आहेत.
५. अशोक डिंडाची पत्नी श्रेयासी रूद्रा
भारतीय संघाचा गोलंदाज अशोक डिंडाने (Ashok Dinda) श्रेयासी रूद्राशी (Shreyasi Rudra) २०१३मध्ये लग्न केले होते. ती अतिशय सुंदर आहे आणि तिच्या सुंदरतेसमोर बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत. श्रेयासीचा जन्म एका बंगाली कुटुंबात ३० मे १९८७ रोजी झाला होता. तिने इंजीनियरिंगची पदवी मिळविली आहे असून ती एका एमएनसी कंपनीत इंजीनियरच्या पदावर काम करत आहे. श्रेयासी आपल्या फीटनेस व आपल्या सुंदरतेची पूर्ण काळजी घेते.
डिंडाला २००९मध्ये भारतीय संघात निवडण्यात आले होते. परंतु त्याला भारतीय संघाकडून अधिक काळ खेळता आले नाही.
त्याने आपला शेवटचा सामना जानेवारी २०१३मध्ये राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता. आपल्या लहान क्रिकेट कारकिर्दीत त्याने भारताकडून एकूण १३ वनडे सामने आणि ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत ५१ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने १४.४१ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या आहेत.
४. परविंदर अवानाची पत्नी संगीता कसाना
भारतीय संघाचा गोलंदाज परविंदर अवानाने (Parvinder Awana) ६ मार्च २०१८ रोजी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले होते. त्याची पत्नी दिल्ली पोलिसात काम करते. अवानाच्या पत्नीचे नाव संगीता कसाना (Sangeeta Kasana) आहे.
अवानाला भारतीय संघात फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने भारतीय संघाकडून केवळ २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले होते. त्यामध्ये त्याने ११.८३ च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. यादरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०१२मध्ये मुंबई येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
३. विनय कुमारची पत्नी रिचा सिंग
मायदेशातील क्रिकेटमध्ये मजबूत संघांपैकी एक असणाऱ्या कर्नाटक संघाला आपल्या नेतृत्वात २ वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा विनय कुमार (Vinay Kumar) खूप साधे आयुष्य जगतो. परंतु त्याची पत्नी रिचा सिंग (Richa Singh) मात्र एकप्रकारे स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे.
या जोडप्याचे लग्न नोव्हेंबर २०१३मध्ये दिल्लीत झाले होते. तसं पाहिलं तर रिचा वाराणसीची आहे.
रिचा बेंगळुरूमधील एका इंटेग्रिटी स्पोर्ट्स कंपनीची डायरेक्टर आहे. त्याचबरोबर रिचाला लेखन आणि फॅशन डिझायनिंगचीही आवड होती.
विनयने भारतीय संघाकडून आतापर्यंत १ कसोटी सामने, ३१ वनडे आणि ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १ विकेट, वनडेत ३८ विकेट्स आणि टी२०त १० विकेट्स घेतल्या आहेत.
२. स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर
भारतीय संघाचा अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीने (Stuart Binny) २०१२मध्ये मयंती लँगरबरोबर (Mayanti Langer) लग्न केले होते. मयंती खूपच सुंदर असून ती सामन्यादरम्यान खेळाडूंची मुलाखत घेताना दिसते. कारण मयंती एक स्पोर्ट्स अँकर आहे. तिच्या संदरतेमुळे बिन्नीही नेहमी चर्चेत येत असतो.
बिन्नी भारतीय संघात फार काळ टिकला नाही. त्याला फार चांगली कामगिरी करता न आल्यामुळे भारतीय संघात सामील केले नाही. त्याने भारताकडून केवळ ६ कसोटी सामने, १४ वनडे सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १९४ धावा आणि ३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने २३० धावा आणि २० विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त त्याने ३५ धावा आणि १ विकेट घेतली आहे.
१. मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय
भारतीय संघाचा फलंदाज मनोज तिवारीचे (Manoj Tiwary) लग्न २०१३ मध्ये सुष्मिता रॉय (Sushmita Roy) बरोबर झाले होते. सुष्मिता आपल्या स्टायलिश लूकमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. त्याचबरोबर ती आपल्या चाहत्यांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. हे जोडपं दरवर्षी परदेशात सुट्ट्यांचा आनंद घ्यायला जातात आणि तेथे फोटोशूटही करतात.
तिवारीने भारतीय संघाकडून १२ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत २६.०९ च्या सरासरीने २८७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी२०त त्याने १५ च्या सरासरीने केवळ १५ धावाच केल्या आहेत.
वाचनीय लेख-
-करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा
-गांगुलीने नुसती दादागिरीच नाही केली तर हे ‘५ कोहिनुर हिरे’ दिले टीम इंडियाला
-सचिनच्या अखेरच्या वनडेत खेळलेले ११ खेळाडू सध्या करतात तरी काय?