---Advertisement---

IND vs ENG: यशस्वी जयस्वालच्या निशाण्यावर द्रविड-सेहवागचा मोठा रेकाॅर्ड! एजबॅस्टनमध्ये इतिहास रचण्याची संधी!

On: शनिवार, जून 28, 2025 8:09 PM
---Advertisement---

Yashasvi Jaiswal can create history in the second Test: भारत विरूद्ध इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारतीय संघासाठी जिंकणे खूप महत्त्वाचे आहे, कारण संघाने मालिकेतील पहिला गमावला आहे. त्यामुळे, एजबॅस्टनमध्ये खेळला जाणारा हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. (India vs England 2nd Test)

दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होईल. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला इतिहास रचण्याची संधी असेल. तो या सामन्यात भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2,000 धावा करणारा फलंदाज बनू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सामन्यांच्या आधारावर सर्वात जलद 2,000 धावा करण्याचा रेकाॅर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. तर, डावांच्या आधारावर सर्वात जलद 2,000 कसोटी धावा करण्याचा रेकाॅर्ड राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आहे. (Fastest 2000 Test runs India)

यशस्वी जयस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 20 सामन्यांत 52.86च्या सरासरीने 1,903 धावा केल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये 2,000 धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त 97 धावा दूर आहे. जर त्याने एजबॅस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत 97 धावा केल्या, तर तो सर्वात कमी सामन्यांमध्ये 2,000 कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल. सध्या हा रेकाॅर्ड लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. गावस्कर यांनी 23 कसोटी सामन्यांत 2,000 धावांचा टप्पा पार केला होता. (Jaiswal batting record)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2,000 धावा करणाऱ्या इतर भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, सुनील गावस्करनंतर राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग या दिग्गजांची नावे येतात. या दोन्ही माजी खेळाडूंनी 25 सामन्यात हा टप्पा गाठला होता. तर, डावांच्या हिशोबाने सर्वात जलद 2,000 कसोटी धावा करण्याच्या रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, तेथे राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग आघाडीवर आहेत. या दोघांनी 40-40 डावात हा रेकाॅर्ड केला होता, तर गावस्कर यांनी 44 डावात 2,000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 38 डाव खेळले आहेत. जर त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 97 धावा केल्या, तर तो सर्वात कमी डावांमध्ये 2,000 कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल. (Fastest 2000 Test runs India)

इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने पहिल्या डावात शतक झळकावले असले तरी, या सामन्यात त्याचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब होते. ज्यामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले. या सामन्यात त्याने 4 झेल सोडले होते. तर दुसऱ्या डावात तो फलंदाजीत अपयशी ठरला आणि केवळ 4 धावा करून बाद झाला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात तो कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Edgbaston Test match)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---