Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ना खुद्द विराट खुश आहे, ना लोक’, खराब फॉर्ममधून जात असलेल्या कोहलीबद्दल युवराजचे वक्तव्य

'ना खुद्द विराट खुश आहे, ना लोक', खराब फॉर्ममधून जात असलेल्या कोहलीबद्दल युवराजचे वक्तव्य

April 28, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli

Photo Courtesy: iplt20.com


भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या २ वर्षांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर त्याला आयपीएल २०२२ मध्येही चांगली फलंदाजी करण्यात यश येत नाहीय. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटला क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. विराटसोबत भारताच्या २०११ विश्वविजेत्या संघाचा भाग असलेल्या युवराज सिंग यानेही विराटला खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी सल्ला दिला आहे. 

आयपीएल २०२२मधील (IPL 2022) मागील ५ डावांमध्ये विराटने (Virat Kohli) ९, ०, ०, १२ आणि १ अशा धावा केल्या आहेत. असे असले तरीही, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी विराटला पुढील सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करण्यासाठी समर्थन दिले आहे. मात्र विराटला चांगल्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी काय करावे लागेल? असा प्रश्न विचारला असताना युवराजने (Yuvraj Singh) त्याला सल्ला दिला (Yuvraj Singh On Virat Kohli) आहे.

विराटने स्वतला या युगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून सिद्ध केले
स्पोर्ट्स १८ शी बोलताना ‘होम ऑफ हिरोज’ या कार्यक्रमात युवराज म्हणाला (Yuvraj Singh Advice To Virat Kohli) की, “विराटला पुन्हा एकदा एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्व बनण्याची गरज आहे. जर तो स्वतला बदलू शकतो. जसा तो यापूर्वी होता, हे त्याच्या खेळातूनही दिसून येईल. विराटने स्वत:ला या युगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे.”

विराटसोबत जे होतंय, त्याने कोणीही आनंदी नाही
“वर्तमानात विराटसोहत जे काही घडत आहे, ते जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंसोबतही घडते. साहजिक आहे की, तो स्वतदेखील आपल्या खराब फॉर्मवर खुश नाहीय आणि लोकही यामुळे हताश आहेत. कारण आपण त्याला खणखणीत शतके करताना पाहिलेय. पण सर्वश्रेष्ठ खेळाडूंसोबत असे होत राहाते,” असेही युवराजने म्हटले.

शास्त्रींनीही दिलाय सल्ला
युवराजव्यतिरिक्त रवी शास्त्रींनीही विराटला सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “मला वाटते की, विश्रांती घेणे त्याच्यासाठी उत्तम असेल. कारण त्याने विश्रांती न घेता विक्रेट खेळले आहे. त्याने सर्व प्रकारांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्यासाठी विश्रांती घेणे शहाणपणाचे ठरेल. तुम्हाला माहिती आहे की, कधी कधी संतुलन बनवावे लागते. तुम्हाला तुमची आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी बनवायची असेल आणि पुढचे ६-७ वर्ष स्वतःची छाप सोडायची असेल, तर आयपीएमधून माघार घ्यावी.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘तीन-चार फ्रँचायझी खोटे बोलल्या, त्यांनी धोका दिला’, हर्षल पटेलचा मोठा खुलासा

रियान परागचा फलंदाजीतच नाही, तर फिल्डिंगमध्येही जलवा; कॅलिस, गिलख्रिस्टच्या पंक्तीत स्थान

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा बाद होणारा बेंगलोर दुसरा संघ, पहिल्या क्रमांकावर ‘या’ संघाचे नाव


ADVERTISEMENT
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

"जर तो धोनीचा चाहता असेल, तर त्याने त्याच्याकडून शिकले पाहिजे", पंतला भारतीय दिग्गजाचा सल्ला

Riyan-Parag-And-Virat-Kohli

नऊ सामन्यात फक्त १२८ धावा करणाऱ्या विराटला काय सल्ला देशील? रियान परागच्या उत्तराने जिंकली सर्वांची मने

MS-Dhoni

माजी भारतीय क्रिकेटरने निवडली 'सार्वकालिन आयपीएल इलेव्हन', धोनीकडे नेतृत्त्वाची धुरा; पाहा संघ

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.