भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. सप्टेंबर महिन्यात भारतातच होणार्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची मालिका असेल. त्यामुळे विश्वचषकासाठीचा संघ निश्चित करण्याची देखील भारताकडे ही शेवटची संधी आहे.
या मालिकेसाठी युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे. नुकतीच या निवडीबाबत इशानने मोठी प्रतिक्रिया दिली. मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंमुळे आपल्या खेळात सुधारणा झाली असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
दिग्गज खेळाडूंसह बातचीत केल्याचा फायदा
इशानने विस्डेनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या फलंदाजीबाबत मोकळेपणाने मत मांडले. मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्या आणि किरोन पोलार्ड यासारख्या दिग्गज खेळाडूंसह बोलल्यामुळे आपल्या फलंदाजीत बरीच सुधारणा झाल्याचे त्याने यावेळी सांगितले. तसेच त्यांच्याशी बोलून आपला आत्मविश्वास पण वाढला असल्याचे तो यावेळी म्हणाला.
इशान म्हणाला, “खेळाडू म्हणून तुम्ही मानसिक रित्या कणखर असणे आवश्यक असते. आणि यात तुमच्या मेंटॉर्स आणि वरिष्ठ खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असते. माझ्या मते प्रत्येक आयपीएलमध्ये मी खूप काही शिकलो. मला तिथे स्वतःला एक्सप्रेस करण्याची संधी मिळाली. हार्दिक पंड्या आणि किरोन पोलार्ड सारख्या खेळाडूंबरोबर बोलल्यानेही मला खूप फायदा झाला. त्याने माझ्या खेळात खूप सुधारणा झाली. ते कशा प्रकारे इनिंग उभारतात, कशा प्रकारे गेम प्लॅन करतात, हे मला शिकायला मिळाले.”
आयपीएलमधील दमदार कामगिरीचे फळ
इशान किशनला मागील आयपीएल हंगामात दमदार कामगिरी केल्याचे फळ भारतीय संघातील निवडीच्या रुपात मिळाले. आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतांना त्याने कमालीचे प्रदर्शन केले होते. इशानने या हंगामात ५१६ धावा करतांना मुंबईकडून त्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा मानही पटकावला होता.
महत्वाच्या बातम्या:
किती ते दुर्दैव! विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी-पड्डीकलने खोऱ्याने काढल्या धावा, तरीही वनडेत संधी नाही
Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग
आयपीएलची चुरस वाढणार, आगामी हंगामात होणार नवीन संघांचा समावेश