कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत हे समजले नाही की, भारतीय संघाचे खेळाडू मैदानावर पुनरागमन केव्हा करणार आहेत. परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला वनडे आणि टी२० मालिकेवर गंभीरतेने विचार करण्यास सांगितले आहे.
कोविड-१९मुळे भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याच्या अनिश्चिततेदरम्यान श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) बीसीसीआयला विनंती केली आहे. एससीएलने म्हटले की, जुलै महिन्यात निर्धारित मालिकेच्या दौऱ्यावर गंभीरतेने विचार करा.
भारतीय संघाच्या पुढील वेळापत्रकात जून-जुलैमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्याचा (Tour of Sri Lanka) समावेश आहे. यामध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत.
‘द आयलँड’ने दिलेल्या माहितीनुसार, “एससीएलने बीसीसीआयला ई- मेल केला आहे. त्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटी होणाऱ्या द्विपक्षीय मालिकेवर विचार करण्यास सांगितले आहे.”
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “खेळाडूंना कठोर क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करावे लागेल. तसेच चाहत्यांची सुरक्षा पाहता मालिकेचे आयोजन प्रेक्षकांविना करण्यात येणार आहे.”
बीसीसीआयचे (BCCI) असे मत आहे की, जोपर्यंत सरकारकडून स्पष्ट सुचना आणि प्रवास करण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यत ते काहीही करू शकत नाहीत. यापूर्वी इंग्लंडचा श्रीलंका दौरादेखील कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) दुसऱ्या सराव सामन्यादरम्यान रद्द करण्यात आला होता. जर भारताचा हा दौराही झाला नाही तर, एससीएलला खूप मोठे आर्थिक नुुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हसीन जहाॅंने शेअर केला व्हिडीओ, चाहते म्हणतात पती शमी व मुलीची तरी लाज ठेव
-एकाच कसोटी सामन्यात १०० व ० धावा करणारे ५ भारतीय खेळाडू
-६० दिवसांनी कोहली दिसला मैदानावर, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल