---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी सिद्धिविनायक चरणी; गौतम गंभीर आणि सूर्याने घेतले बाप्पाचे आशीर्वाद

On: शनिवार, मार्च 14, 2026 7:11 PM
---Advertisement---

२०२६ टी-२० विश्वचषक विजेती टीम इंडिया जेव्हा अहमदाबादमधील हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी पोहोचली होती, तेव्हा मोठा गदारोळ झाला होता. आता चॅम्पियन भारतीय संघ मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाला पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ८ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९६ धावांच्या विक्रमी फरकाने पराभव केला होता. सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

​भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे देखील भगवान गणेशाच्या दर्शनासाठी पोहोचले. यावेळी दोघेही टी-२० विश्वचषक ट्रॉफीसह दिसले आणि त्यांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.

​भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत अतिशय दमदार कामगिरी केली. संघाने ‘ग्रुप ए’ मध्ये अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर सुपर-८ मध्ये वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती. सुपर-८ च्या एका सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली चूक मान्य करताना म्हटले होते की, त्या सामन्यातून अक्षर पटेलला संघातून वगळणे ही त्याचीच मोठी चूक होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---