क्रिकेटचा सर्वात कठीण स्वरुप कसोटी क्रिकेटला मानले जाते आणि कोणत्याही कर्णधाराला या स्वरूपात यशस्वी होणे सोपे नाही. प्रत्येक कसोटी कर्णधारला या स्वरुपात जास्तीत जास्त यश मिळवून यशस्वी व्हायचे असते. काही कर्णधार मायदेशात व परदेशातही यश मिळवतात आणि काहीजण घरीही चांगली कामगिरी करतात. परदेशात जाऊनकसोटी सामने जिंकून आपल्या नेतृत्वात यश संपादन करावे अशी प्रत्येक संघाच्या कर्णधाराची इच्छा असते.
भारत हा एक असा देश आहे, जेथे कोणताही संघ दौऱ्यावर येतो तेव्हा त्यांच्यासाठी कसोटी क्रिकेटच्या स्वरुपात फारच अवघड असते. येथे परदेशी कर्णधारांना एकही सामना जिंकणे सोपे नसते. भारताला त्याच्या घरच्या मैदानावर कसोटीत पराभूत करणे खूप कठीण आहे कारण भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना परिस्थितीचा अंदाज असल्यामुळे त्यांच्या खेळामध्ये अधिक सुधारणा होते.
असे अनेक दिग्गज कर्णधार आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले, परंतु त्यांना भारतामध्ये एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. या लेखात आम्ही त्याच तीन कर्णधारांवर चर्चा करणार आहोत ज्यांना भारतात एकाही कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नाही.
१. मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याची कर्णधार म्हणून कामगिरी उत्तम आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने बऱ्याच अविस्मरणीय कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. रिकी पॉन्टिंगने कर्णधारपद सोडल्यानंतर क्लार्कने ऑस्ट्रेलियाची कमान आपल्या हाती घेतली आणि आपली जबाबदारी चांगली पार पाडली. परंतु कर्णधार म्हणून क्लार्कला भारताच्या जमिनीवर एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. क्लार्कने कर्णधार म्हणून भारतात तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्कारावा लागला.
२. स्टीफन फ्लेमिंग
स्टीफन फ्लेमिंगला न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून मानला जातो. या खेळाडूने आपल्या नेतृत्वाखाली आपल्या संघाला एकजूट ठेवण्यात यश मिळवले व न्यूझीलंडला अनेक सामन्यांमध्ये मोठी विजय मिळवून दिले. फ्लेमिंगने आपल्या कर्णधारपदी असताना दोन वेळा भारताचा दौरा केला आणि परंतु दोन्हीवेळी एकही कसोटी सामन्यात विजय मिळाले नाही.
१९९९ मध्ये तीन सामन्याकरिता भारत दौर्यावर आलेल्या या संघाने पहिला आणि तिसरा सामना अनिर्णित ठेवला. पण दुसर्या सामन्यात हा संघ हरला होता. यानंतर २००३ साली दोन कसोटी सामन्यांसाठी भारतात आलेल्या न्यूझीलंड संघाला दोन्ही सामने अनिर्णित केले. अशाप्रकारे, फ्लेमिंगने भारताविरुद्धाच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये चार सामने अनिर्णित केले आणि एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला.
३. रिकी पाँटिंग
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंगचे कर्णधार म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये खूप मोठे नाव आहे. या खेळाडूने त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघाला क्रिकेटच्या नवीन स्तरावर नेले आणि तो कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाचा पराभव करणे ही खूप मोठी गोष्ट होती. मात्र रिकी पॉन्टिंग सारख्या अनुभवी कर्णधाराला सुद्धा भारतात एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. रिकी पाँटिंगने कर्णधार म्हणून भारतात सात कसोटी सामने खेळले असून पाच सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले, तर दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय संघावरील चिंतेचे सावट गडद; हा खेळाडू ब्रिस्बेन कसोटीत खेळण्याबद्दल साशंकता
सिडनी कसोटीतील कामगिरीचा जडेजाला फायदा, अष्टपैलूंच्या क्रमवारीत पोहोचला या स्थानी
टीम इंडियाच्या खेळाडूंच्या तक्रारींची बीसीसीआयकडून दखल, ब्रिस्बेनच्या हॉटेलमध्ये सोयी-सुविधांचा अभाव