कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात पहिला सामना १८७७ साली १५ मार्च ते १९ मार्चदरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात खेळला गेला होता. तो सामना ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकला होता. त्यानंतर हळूहळू क्रिकेटने लोकांच्या मनात घर करायला सुरुवात केली. वेळेनुसार क्रिकेटपटूंचे प्रदर्शनही उत्कृष्ट होत गेले आणि एकापेक्षा एक शानदार विक्रमांची नोंद होत गेली.
जरी कसोटी क्रिकेटची सुरुवात १८व्या शतकात झाली असली. तरी भारतीय संघाने त्यांचा पहिला कसोटी १९व्या शतकात अर्थात १९३२ साली खेळला. तेव्हापासून भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वीनू मंकड, सुनील गावसकर, विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर असे दिग्गज सलामीवीर फलंदाज होऊन गेले. भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पहिल्या विकेटसाठी अविस्मरणीय भागिदाऱ्या केल्या आहेत.
पण, या लेखात आपण कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीरांच्या जोडींनी केलेल्या सर्वात मोठ्या ३ भागिदाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत. 3 Biggest First Wicket Partnership In Test Cricket Of Indian Team
कसोटीत पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या जोड्या –
३. मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा –
मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा यांची जोडी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विशाखापट्टनम येथे हा कारनामा केला होता. ऑक्टोबर २०१९मध्ये झालेल्या या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मयंक आणि रोहितने मिळून पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची जबरदस्त भागिदारी केली होती.
त्या डावातत मयंकने २१५ धावांची खेळी केली होती. तर, रोहितने १७६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने तो सामना २०३ धावांनी जिंकला होता.
२. विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड –
१३ जानेवारी २००६ रोजी लाहोर येथे पाकिस्तान विरुद्ध भारत संघामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यातील पहिला डाव पाकिस्तानने ६७९ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारतीय संघानेही त्यांच्या पहिल्या डावाची जबरदस्त सुरुवात केली. सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडने मिळून पहिल्या विकेटसाठी ४१० धावांची भागिदारी केली होती.
सेहवाग २५४ धावांवर बाद झाला होता, तर द्रविडने नाबाद १२८ धावा केल्या होत्या. तो सामना अनिर्णीत राहिला होता.
१. विनू मंकड आणि पंकज रॉय –
भारताकडून कसोटीत पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी विनू मंकड आणि पंकज रॉय यांनी केली होती. या दोघांनी मिळून न्यूझीलंविरुद्ध ४१३ धावा केल्या होत्या. त्यांचा हा विक्रम आजपर्यंत कोणतीही भारतीय सलामीवीरांची जोडी तोडू शकली नाही.
जानेवारी १९५६ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील पाचवा कसोटी सामना चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५३७ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात २०९ धावा केल्या आणि भारताने फॉलोऑन दिल्यानंतर दूसऱ्या डावात २१९ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे भारताने तो सामना १ डावाने आणि १०९ धावांनी जिंकला होता.
भारताने खेळलेल्या पहिल्या डावात मंकड यांनी २३१ धावा आणि पंकज यांनी १७३ धावा केल्या होत्या. त्यांनी मिळून केलेली ४१३ धावांची भागिदारी ही क्रिकेटजगतातील पहिल्या विकेटसाठीची दूसरी सगळ्यात मोठी भागिदारी आहे.
ट्रेंडिंग लेख –
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लॉप ठरलेले क्रिकेटर या वेळी होऊ शकतात हिरो
या पाच दिग्गजांची मुले पुढे खेळू शकतात राष्ट्रीय संघासाठी
एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपर किंग्जचे संकट वाढले, दुबईला जाणे झाले कठीण
कुठे व कधी पाहाणार आयपीएल २०२०, जाणून घ्या यावेळी होत असलेल्या आयपीएलबद्दल सर्वकाही
बीसीसीआयने बदलले देशांतर्गत क्रिकेटचे नियम, आता कोचिंग करण्यासाठी आहे या वयाची अट