रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने वेगवान सुरुवात करू दिल्यानंतरही मधल्या फळीतील फलंदाज सपशेल फेल ठरले. परिणामी भारतीय संघाला शेवटी 1 धाव काढता आली नाही आणि सामना बरोबरीत सुटला. दुसऱ्या वनडे सामन्यातही कर्णधार रोहितने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. परंतु त्याची विकेट पडल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि पाहुण्यांनी 32 धावांनी हा सामना गमावला.
यानंतर जर भारतीय संघ तिसरा वनडे सामनाही जिंकू शकला नाही तर या मालिकेनंतर काही खेळाडूंवर पराभवाचा ठपका बसू शकतो. आम्ही तुम्हाला त्या तीन खेळाडूंबद्दल सांगत आहोत, ज्यांना श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर वनडे संघातून कायमचे बाहेर केले जाऊ शकते.
3. खलील अहमद
खलील अहमदला अद्याप भारताकडून श्रीलंका मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याचा बॅकअप म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. याच कारणामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जात नाहीये. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीचे संघात पुनरागमन होताच खलील अहमदला वगळण्यात येईल. त्यानंतर त्याचे वनडे संघात पुनरागमन होणे कठीण आहे.
2. शिवम दुबे
शिवम दुबेला भावी अष्टपैलू म्हणून तयार केले जात आहे. परंतु तो आतापर्यंत श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत अजिबात छाप पाडू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याची गोलंदाजी चांगली होती पण फलंदाजी करताना तो फ्लॉप झाला. अशातच भारतीय संघाकडे रियान परागचाही पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय हार्दिक पांड्या भारताच्या मर्यादित संघांचा प्रमुख अष्टपैलू आहे. अशा परिस्थितीत शिवम दुबेला खराब प्रदर्शनामुळे वनडेतून कायमचे बाहेर जावे लागू शकते.
1. श्रेयस अय्यर
वनडे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरवर खूप विश्वास ठेवला जातो, परंतु आजपर्यंत तो अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात 23 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या सामन्यात त्याला फक्त 7 धावा करता आल्या. मधल्या फळीत रिषभ पंत असल्याने आणि संजू सॅमसनही उत्तम पर्याय आहे. येत्या काळात सूर्यकुमार यादवही वनडे संघात येऊ शकतो. या कारणामुळे श्रेयस अय्यरला वनडे संघातून कायमचे वगळले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉ वेधतोय प्रशिक्षक गंभीरचं लक्ष! वनडे कप स्पर्धेत 44 चौकारांच्या मदतीने केल्यात 294 धावा
बांगलादेशचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दासचं आंदोलकांनी खरंच घर पेटवलं का? जाणून घ्या सत्य
आयपीएल 2025च्या हंगामात बदलणार 6 संघांचे कर्णधार?