भारतीय संघ कसोटी इतिहासात सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. आता पर्यंत भारतीय संघाने कित्येक उत्कृष्ट सामने जिंकेल आहेत आणि बरेच दिग्गज फलंदाज कसोटी इतिहासात भारताकडून घडले आहेत. सुनिल गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, सचिन तेंडुलकर, एकनाथ सोलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, आणि राहुल द्रविड सारखे दिग्गज खेळाडू भारताने क्रिकेट जगताला दिले आहेत.
साधारणपणे नेहमीच भारतीय संघ फलंदाजाचा गड मानला जातो. कारण भारतीय संघातील खेळाडूनी कसोटी क्रिकेट भरपूर धावा केल्या आहेत. जास्तीत जास्त भारतीय संघ आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकला आहे. परंतु काही वेळा असे ही झाले की, भारतीय फलंदाजी ढेपाळलेली पाहायला मिळाली. कसोटी क्रिकेटमध्ये बर्याचदा भारतीय फलंदाज अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भारतीय संघाने खुप कमी धावसंख्या फलकावर लावली आहे. त्यामुळे आज आपण या लेखामधून भारतीय संघाच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी तीन धावसंख्या पाहणार आहोत.
3)ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये 58 (1947)
या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 382 धावसंख्येवर डाव घोषित केला होता. कर्णधार डॉन ब्रॅडमॅन यांनी सर्वाधिक 185 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव 58 धावावर गुंडाळला गेला. कर्णधार लाला अमरनाथने सर्वाधिक 22 धावा केल्या होत्या. त्यांच्या शिवाय इतर कोणताच फलंदाज मोठी खेळी करू शकला नव्हता. संघाचे आठ फलंदाज दुहेरी धावसंख्या सुद्धा गाठू शकले नव्हते.
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने फाॅलोअॉन दिला होता आणि दुसर्या डावात पुन्हा एकदा भारतीय संघ 98 धावसंख्येवर गुंडाळला. यामुळे भारतीय संघाला एक डाव आणि 226 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.
2) इंग्लंड विरुद्ध लॉर्डसमध्ये 42 (1974)
या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 1 डाव आणि 285 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 629 धावा केल्या होत्या. सलामी फलंदाज डेनिस एमिसने 188 धावांची दमदार खेळी साकारली होती आणि कर्णधार माइक डेनेसने सुद्धा शतकी खेळी केली होती. त्याबरोबर टोनी ग्रेनने 106 धावा केल्या होत्या.
उतरार्थ भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 302 धावा केल्या होत्या. फारूख इंजिनियरने सर्वाधिक 86 धावा काढल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाने फॉलोऑन खेळताना दुसर्या डावात भारताने फक्त 42 धावा काढल्या होत्या. त्यावेळी भारतीय संघाकडून एकनाथ सोलकर वगळता इतर कोणत्याच भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नव्हती. सोलकरने नाबाद 18 धावा केल्या होत्या.
1) ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड 36 (2020)*
ही भारतीय संघाच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. पहिल्या डावात भारताने 244 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावांवर रोखले होते. त्याचबरोबर 50 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली होती. सगळ्यांना वाटले या सामन्यात भारत वर्चस्व गाजवेल, परंतु तिसर्या दिवशी वेगळाच दिवस उजाडला.
बघताबघता भारतीय संघाने 19 धावसंख्येवर 6 गडी गमावले. ही इतिहासातील पहिली वेळ होती जेव्हा भारतीय संघाने 6 गडी फक्त 19 धावात गमावले. भारतीय संघाच्या कोणत्याही खेळाडूला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही, तर तीन फलंदाज खाते ही उघडू शकले नाही. भारतीय संघाची 36/9 धावसंख्या असताना मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे भारतीय संघ 36 धावांवर कोसळला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 8 गडी राखून जिंकला.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस