भारतात क्रिकेट हा सर्वाधिक पाहिला आणि खेळला जाणारा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाचे चाहते अनेक पटीने जास्त आहेत. भारतात गुणवंत खेळाडूंची कमी नसून देशांतर्गत पातळीवर खेळणाऱ्या संख्या देखील अफाट आहे. पण त्यापैकी खुपच कमी खेळाडूंना देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता येते. यामध्ये असेही काहीजण असतात, ज्यांना भारतीय संघात निवडले जाते, पण प्रत्यक्षात खेळण्याची संधी मात्र कधीच मिळाली नाही. आपण या लेखात अशाच पाच वेगवान गोलंदाजांचा विचार करणार आहोत, ज्यांना 2000 सालानंतर भारतीय संघात निवडले गेले, पण खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही.
1. शिबशंकर पॉल –
शिबशंकर पॉल (Shibshankar Paul) हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघासाठी खेळले आणि त्यांचे या संघासाठीचे योगदान मोठे राहिले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 61, लीस्ट ए क्रिकेटमध्ये 61 आणि 8 देशांतर्गत टी-20 सामने खेळले. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यांनी अनुक्रमे 220, 86 आणि 12 विकेट्स घेतल्या. 2000 साली देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने 2016 साली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यादरम्यानच्या काळात पॉल यांना दोन वेळा भारतीय संघात निवडले गेले, पण एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. 2004 साली ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर असताना, तर दुसऱ्यांदा डिसेंबर 2016 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत पॉल भारतीय संघाचा भाग राहिले होते. मात्र, प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकले नाही.
2. रणदेब बोस –
रणदेब बोस (Ranadeb Bose) देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज राहिले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रनादाब बोस यांच्या नावावर 91 सामन्यांची नोंद आहे, ज्यात 317 विकेट्स घेतल्या. लीस्ट ए क्रिकेटमध्ये 82 सामन्यांमध्ये 126, तर देशांतर्गत टी-20 क्रिकेटमधील 11 सामन्यात 11 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत. आपल्या याच भेदक गोलंदाजीच्या जोरावर बोस यांना 2007 साली भारतीय संघात निवडले गेले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रानादाब बोस भारतीय संघाचा भाग होते, पण त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मात्र मिळाली नाही. त्यावेळी संघात आरपी सिंग, जहीर खान आणि एस श्रीसंत त्यावेळी संघात असल्यामुळे रानादाब बोस यांना भारतीय संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली नाही.
3. राकेश पाटील –
देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करणारे राकेश पाटील (Rakesh Patel) देखील कधी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकले नाहीत. 1998 साली त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 67 प्रथम श्रेणी, 32 लिस्ट ए आणि 2 टी-20 सामन्यांमध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. 2002 साली भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असताना पाटील यांनाही या दौऱ्यासाठी वनडे संघात निवडले गेले होते. पण त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मात्र मिळाली नाही. भारतीय संघात त्यांची ही पहिली आणि शेवटची निवड ठरली, ज्यात त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही.
4. इश्वर पांडे –
ईश्वर पांडे (Ishwar Pandey ) देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाचा महत्वाचा फलंदाज राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे वॉरिअर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची आकडेवारी चांगली राहिली असली, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न कधी पूर्ण होई शकले नाही. 130 किमी ताशी गतीचा चेंडू स्विंग करण्याची क्षणता असलेला हा वेगवान गोलंदाज 2014 साली भारतीय संघात सामील झाला. त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात घेतले गेले, पण प्रत्यक्षात खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही. पांडेच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 75, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 58, तर टी-20 फॉरमॅटमध्ये 71 सामने खेळण्याची नोंद आहे. यात त्याने अनुक्रमे 263, 63 आणि 68 विकेट्स घेतल्या आहेत.
5. बासील थंपी –
29 वर्षीय वेगवान गोलंदाज बासील थंपी (Basil Thampi) आयपीएलमध्ये गुजरात लायंस आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने केरळ संघासाठी 45 प्रथम श्रेणी, 31 लिस्ट ए आणि 80 टी-20 सामने खेळले. या तिन्ही फॉरमॅटमध्ये थंपीने अनुक्रमे 102, 41 आणि 80 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2017 थंपीने चांगलाच गाजवला आणि त्यानंतर भारतीय संघात स्थान पक्के केले. 2017 साली भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेसाठी त्याला भारतीय संघात संधी मिळाली. संघ व्यवस्थापनाने मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर आणि जयदेव उनाडकटसारखे गोलंदाज संघात असल्यामुळे थंपीला संधी दिली नाही.
(5 unlucky cricketers who get selected in Team India and did not play a single match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताची चिंता वाढली! तिसऱ्या कसोटीतही नाही खेळू शकरणार हा महत्वाचा फलंदाज?
केएल नक्की चुकतोय कुठे? गांगुलींनी सांगितली राहुलची कमजोरी, म्हणाले…