झिम्बाब्वेने रोमहर्षक पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा 3 धावांनी पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या षटकात यजमान आयर्लंडला विजयासाठी 6 धावा करायच्या होत्या. पण वेगवान गोलंदाज रिचर्ड नागरवाने फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या अन् झिम्बाब्वेने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह झिम्बाब्वेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेला टी -20 विश्वचषकापूर्वीची तयारी म्हणून पाहिले जात आहे.
आयर्लंडच्या संघाने झिम्बाब्वेच्या 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पॉल स्टर्लिंग (24 धावा) आणि केविन ओब्रायन (25 धावा) यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, यानंतर संघाचे एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले आणि 7 गडी बाद 88 धावा झाल्या. अशा बिकट स्थितीत सिमी सिंगने नाबाद 28 धावा करून संघाची धुरा सांभाळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने 22 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 28 धावा केल्या. अशाप्रकारे आयर्लंड संघ निर्धारित 20 षटकांत 9 गडी बाद 114 धावा करू शकला.
निर्णायक अशा 20 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंमध्ये रिचर्ड नागरवाने एकही धाव दिली नाही. मोठा फटका खेळण्याच्या नादात सिमी सिंगला धावा करता आल्या नाहीत. तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. यानंतर, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर नागरवाने बॅरी मॅकगार्थी आणि क्रेग यंगला बाद केले. जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. पण सिमी सिंगला फक्त एक धाव करता आली आणि अशा प्रकारे आयर्लंडने हा सामना 3 धावांनी गमावला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला गेलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नव्हती. संघाने 43 धावांत 3 गडी गमावले होते. पुढे रेगिस चकाब्वाने 28 चेंडूत आक्रमक 47 धावा करत संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. त्याने आपल्या खेळीदरम्यान 4 चौकार आणि एक षटकार ठोकला. 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मस्कादझानेही नाबाद 19 धावा केल्या. त्यामुळे झिम्बाब्वे संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी बाद 117 धावा केल्या होत्या. आयर्लंडकडून क्रेग यंग आणि सिमी सिंगने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
निर्णायक टी२०त ओमानची बाजी, ३ विकेट्सने सामना जिंकत मालिकेवरही कोरले नाव
विराटसेना तिसऱ्या डावात गाठणार ५०० धावांचा पल्ला? याआधी हेडिंग्लेमध्येच केली होती ही कामगिरी
‘रिषभला स्टान्स का बदलायला सांगितला?’ म्हणत गावसकरांनी चक्क पंचांना ऐकवले नियम