जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ तयार दिसत आहेत. 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. उभय संघांतील ही लढत रोमांचक ठरण्याची अपेक्षा सर्वांनाच आहे. कर्णधाराच्या रूपात रोहित शर्मा पहिल्यांताच आयसीसीचा अंतिम सामना खेळणार आहे. भारतीय संघ मागच्या वेळी डब्ल्यूटीसी जिंकू शकली नाही, याचा कुठलाच दबाव संघावर नाही, असी प्रतिक्रिया रोहितने दिली.
मागच्या वेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. पण अंतिम सामन्यात येऊन भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाला या पराभवामुळे अनेकदा सुनावले गेले आणि अजूनही हे सत्र सुरूच आहे. असे असले तरी, बुधवारी (7 मे) पहिल्यांदाच आयसीसीच्या अंतिम सामन्यात कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याने खास प्रतिक्रिया दिली. रोहितच्या मते मागच्या वेळी काय झाले, याचा काहीच परिणाम संघावर होत नाही. संघ त्याविषयी विचार करत नाहीये आणि वारंवार याविषयी बोलणे चुकीचे आहे.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी रोहित शर्मा म्हणाला, “भूतकाळात काय झाले याचा आम्ही विचार करत नाही. मागच्या आयसीसी स्वर्धेत काय झाले, याची आठवण करून देणेही चुकीचे आहे.” इंग्लंडची खेळपट्टी आणि प्लेइंग इलेव्हनविषयी रोहित म्हणाला, “खेळपट्टी सतत बदलत आहे. उद्या खेळपट्टी कशी असेल, ते सांगता येत नाही. रविचंद्रन अश्विन खेळत नाहीये, असे मी म्हणणार नाही. याविषयी उद्या निर्णय घेतला जाईल. खेळपट्टी पाहून ते ठरेल.”
डब्ल्यूसीटीच्या अंतिम सामन्यात खेळणारे बहुतांश खेळाडू इंडियन प्रीमियर लीग खेळून आले आहेत. असात खेळाडूंना टी-20 क्रिकेटनंतर कसोटी क्रिकेट खेळावे लागणार आहे. यासाठी संघाच्या रणनीतीवर रोहित शर्मा म्हणाला, “माझ्या लक्षात नाही की, मागच्या भारतीय संघाला अखेरची मोठी विश्रांती कधी मिळाली होती. प्रत्येक वर्षी असेल होत आले आहे. आमच्यासाठी हे नवीन नाही, आता याची सवय झाली आहे.” आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारा शुबमन गिल डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात कसे प्रदर्शन करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहितने सांगितल्याप्रमाणे गिलला या सामन्याआधी, कुठल्याच सल्ल्याची गरज नाहीये. रोहित म्हणाला, “काय केले पाहिजे, याविषयी गिलला कोणत्याच सल्ल्याची गरज नाहीये. त्याला फलंदाजी करायला आवडते. आयपीएलमध्ये त्याने दोन मिठी शतके ठोकली आहेत. भारतीय संघाला अपेक्षा आहे की तो खेळपट्टीवर अधिक वेळ घालवेल. तो खूपत आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू आहे.” (A day before the WTC final, Rohit Sharma explained the team’s strategy to the media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
MPL 2023 लिलावात सर्वात महागडा ठरलेला नौशाद शेख आहे तरी कोण? 10 पट रक्कम घेत झाला कोल्हापूकर
BREAKING! डब्ल्यूटीसीच्या एक दिवस आधी रोहितला दुखापत, सराव सत्र अर्ध्यात सोडले