भारतात क्रिकेटची लोकप्रियता प्रंचड आहे. देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाचे कधी ना कधी क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न असतेच. पण प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच खेळाडू क्रिकेटमध्ये नाव करू शकतात. असे असले तरी, भारतात प्रत्येकजण क्रिकेट खेळतोच. प्रत्येक छोट्या गालात आणि प्रत्येक गल्लीमध्ये क्रिकेटचा एक संघ असतोच. पण जालण्यातील एका अशाच लोकल क्रिकेट सामन्यात एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्यातील चाळीसगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. लोकल क्रिकेट सामन्यात पेटलेल्या वादातून 12 जणांच्या टोळक्याने विरोधी संघातील खेळाडूला मारहान केली. याचदरम्यान शुभम अगोने (वय 28) याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे शुभम हा महाराष्ट्र पोलीसमध्ये हवालदार पदावर कार्यरत होता. त्याची हत्या केल्या प्रकरणीत पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाकडून या तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीगेली आहे.
याप्रकरणी अधिकची माहिती अशी की, शुभम अगोन हा पोलीस दलात कार्यरत होता. तो गवी असताना ही घटना त्याच्यासोबत घडली आणि यातच आपली जीव देखील गमावला. शुभम हा चाळीसगाव येथे आयोजित क्रिकेट सामना जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. सामन्यादरम्यान विरोधी संघातील खेळाडूंसोबत शुभमचा शाब्दिक वाद झाला होता. याच राग डोक्यात ठेऊन विरोधी संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंनी रविवारी शुभम आणि त्याच्या एका मित्राला मारहाण केली. या मारहाणीतून शुभमचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र आनंद गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली गेली आहे. आतापर्यंत तिघांना अटक केली गेली आहे. (A police constable died in a fight in a cricket match)
महत्वाच्या बातम्या –
एका वर्षात कमिन्सने शक्य ते सर्व मिळवलं! डिसेंबरमधील कामगिरीची आयसीसीकडून दखल
Kane Williamson । पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला धक्का! कर्णधार संपूर्ण मालिकेतून बाहेर