भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय बोर्डाने मंगळवारी (4 जुलै) भारतीय वरिष्ठ पुरुष संघाच्या नवीन मुख्य निवडकर्त्याच्या रूपात अजित आगरकर याची निवड केली. आगरकर याच्या निवडीमुळे मागील पाच महिन्यांपासून रिक्त असलेले निवडसमिती अध्यक्षपद आता भरले गेले आहे. हे महत्त्वाचे पद मिळाल्यानंतर त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या असून, भारताचा एक मजबूत संघ तयार करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.
आगरकर याची नियुक्ती झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने आपली प्रतिक्रिया दिली. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाला,
“ज्याप्रकारे प्रशिक्षक संघाची कामगिरी करून घेतो हे लोक पाहतात त्याचप्रमाणे निवडसमिती अध्यक्ष म्हणून तुम्ही काय निर्णय घेता याकडे लोकांचे लक्ष असेल. तुमच्या योजना कशा आहेत? तुम्ही काय निर्णय घेणार? युवा खेळाडूंना संधी देणार का? असे प्रश्न तुम्हाला सातत्याने विचारले जातील.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“निवडसमिती अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे अनेक अधिकार असतात. तुम्ही कर्णधाराला प्रश्न विचारू शकता. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविचंद्रन अश्विनला का वगळले होते? हा प्रश्न तुम्ही रोहितला विचारायला हवा.”
अजित आगरकर याच्यापूर्वी माजी दिग्गज खेळाडू चेतन शर्मा भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते होते. त्यांनी दीर्घ काळ हे पद सांभाळले. मात्र, एका न्यूज चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये केलेल्या धक्कादायक खुलास्यांनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर 5 महिने मुख्य निवडकर्त्याचे पद कमी होते. अध्यक्ष म्हणून आपली पहिलीच जबाबदारी पार पाडताना त्याने यशस्वी जयस्वाल व तिलक वर्मा यांना भारतीय संघात स्थान दिले आहे.
(Aakash Chopra Advice To New Selection Committee Chairman Ajit Agarkar)
महत्वाच्या बातम्या-
कॅरेच्या हेअरकटच्या पैशांवरून वातावरण तापले! धमकी अन् इंग्लिश मीडियाच्या बातमीनंतर स्मिथकडून पोलखोल
वॉर्नरच्या Thread पोस्टवर कमिन्सने सल्ला देताच लोटपोट झाला रिषभ पंत; म्हणाला, ‘भावा…’