यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) अफगाणिस्तान संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. (25 जून) रोजी अफगाणिस्ताननं बांगलादेशचा पराभव करुन सेमीफायनलमध्ये धडक मारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयसीसीच्या स्पर्धेत अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये पहिल्यांदाच गेला आहे. त्यामुळे देशातील करोडो क्रिकेट चाहतेही सेमीफायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर जल्लोष करत आहेत. अफगाणिस्तानच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात सत्तेवर असलेल्या तालिबानने भारताला खास संदेश दिला आहे.
अफगाणिस्तान संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात धडक मारल्यानं अफगाणिस्तानमध्ये सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. यादरम्यानं तालिबाननं भारताचं आभार मानत एक संदेश दिला आहे की, “आम्ही भारताचे आभारी आहोत की त्यांनी अफगाणिस्तान संघांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.” भारताने गेल्या 10 वर्षांत अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासासाठी भारतानं फक्त आर्थिक आणि तांत्रिक मदत केली नाही, तर मैदानसुद्धा दिलं आहेत. डेहराडून हे फार पूर्वीपासून अफगाणिस्तानचे घरचे मैदान आहे. अफगाणिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी परदेशी संघ डेहराडूनला येत होते. परंतू आता आयपीएलमध्येही अफगाणिस्तानच्या खेळाडूंना मोठी मागणी आहे.
अफगाणिस्तान संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत 5 विजय मिळवले आहेत. यंदाच्या टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज तसंच चॅम्पियन संघाला त्यांनी धूळ चारत इतिहास रचला आहे आणि बांगलादेशचा पराभव करुन सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनल 1 मध्ये अफगाणिस्तान संघ (27 जून) रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खराब क्षेत्ररक्षणामुळे जोनाथन ट्राॅट भडकले, कचराकुंडीला मारली जोरात लाथ
फक्त 20 दिवसांत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने, पहा वेळापत्रक
स्टार हॉकीपटूंच्या मैत्रीपूर्ण सामन्याने भरले अनोखे रंग