भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना मंगळवारी (27 नोव्हेंबर) गुवाहाटीमध्ये खेळला गेला. ऋतुराज गायकवाड याने भारतासाठी वादळी केळी केली आणि शतक देखील साकारले. पण गोलंदाजी विभागातील खेळाडू भारतीय संघासाठी अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. संघासाठी सर्वात महागात पडलेल्या प्रसिद्ध कृष्णा याची स्वतः ऋतुराजनेच पाठराखन केली.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) मंगळवारी बरसापारा स्टेडियमवर सामनावीर ठरला. मॅक्सवेलने 48 चेंडूत 104* धावांची वादळी खेळी केली. परिणामी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 5 विकेट्स राखून पराभूत केले. असे असले तरी, भारताच्या डावात ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याची खेळी अप्रतिम होती. ऋतुराजने अवघ्या 57 चेंडूत 123* धावा कुटल्या. यात 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. असे असले तरी, सलामीवीर फलंदाजाची ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यास परेशी ठरली नाही.
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) महागात पडला. कृष्णाने टाकलेल्या चार षटकांमध्ये सर्वादिक 68 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. या प्रदर्शनानंतर प्रसिद्ध कृष्णावर टीका देखील होत आहे. पण शतकवीर ऋतुराज पराभवानंतर देखील त्याच्या पाठीशी उभा राहिला. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत ऋतुराज म्हणाला की, “ही चिंतेची बाब आहे, असे मला वाटत नाही. आम्ही ओल्या चेंडूने गोलंदाजी करत असल्यासारखेच वाटत होते. गोलंदाजांसाठी नक्कीच हे काम सोपे नव्हते. मैदानातील परिस्थिती कठीण होती आणि आपण ते मान्य करून पुढे गेले पाहिजे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात मॅक्सवेलसह कर्णधार मॅथ्यू वेड यानेही महत्वाच्या 28 धावा केल्या. या दोघांनी मिळून शेवटच्या पाच षटकात 80 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. उभय संघांतील ही टी-20 मालिका पाच सामन्यांची आहे. भारतीय संघ पहिल्या दोन सामन्यात, तर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारत 2-1 अशा आघाडीवर असून मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) रायपूरमध्ये आयोजित केला गेला आहे. (After the defeat, Rituraj Gaikwad supported the Prasidh Krishna)
महत्वाच्या बातम्या –
पर्याय नाही म्हणून द्रविड! आगामी टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा होता वेगळाच प्लॅन
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केलेल्या ऋतुराजबद्दल माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘उलट त्याला स्वातंत्र्य…’